पोस्ट्स

भयानक वास्तवाकडे वाटचाल [भाग 4]

इमेज
        आजमितीस जगाचा विचार केला असता एकच  मुदा चर्चेत आहे तो म्हणजे अफगाणिस्तान .  दररोज अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सरशी आणि अफगाणिस्तानच्या सरकारची पीछेहाट या बाबतच्या  बातम्या अतंराष्ट्रीय माध्यमे सातत्याने  देत असतात .  समर्थ रामदास स्वामी यांच्या ''जे जे आपणशी ठाव ते ते सकलांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकल जण'' या उक्तीनुसार ते आपणापर्यत पोहोचवण्यासाठी  आजचे लेखन .  तर मित्रानो , अफगाणिस्तानच्या बऱ्याच मोठ्या भूभागावर ताबा आलेल्या आणि दिवसोंदिवस तो मोठ्या प्रमाणात वाढत  असलेल्या तालिबानकडून तुर्की या देशाला कडक इशारा देत देश सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे जर तुर्की अफगाणिस्तान हा देश सोडून न गेल्यास आम्ही त्यांच्यावर परदेशी लोकांचे स्वदेशावर आक्रमण असे समजून  हल्ला करू . यामध्ये होणाऱ्या नुकसानीस तुर्की लोकच  जवाबदार असतील असे तालिबानकडून जाहीर करण्यात येत आहे . शीतयुद्धाच्या वेळी त्यावेळेच्या कम्युनिष्ट प्रभावाला रोखण्यासाठी अमेरिकेने उभारलेली लषकरी संघटना म्हणजे नाटो. अर्थात नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑ...

नैसर्गिक आपत्ती आणि आपण

इमेज
    सोमवार 12जूलै रोजी उत्तर भारतासाठी काळा दिवस ठरला. राजस्थानमध्ये  विविध ठिकाणी वीज कोसळून अनेक निष्पाप जीव प्राणास मुकले. तर हिमाचल प्रदेशातील धरमशाला परीसरात ढगफुटी होवून निसर्गाने आपले रौद्ररुप दाखवले. या नैसर्गिक आपत्तीमध्ये प्राणास मुकलेल्या जीवांना प्रथमतः भावपुर्ण आदरांजली. तसेच या दुर्घटनांमध्ये आपले आप्तेष्ठ मित्रपरीवार तसेच आर्थिक नुकसानीला सामोरे गेलेल्या व्यक्तींना आपापले दुःख पचवण्याची ताकद इश्वर त्यांना देवो, ही इश्वरचरणी प्रार्थना . सध्या आपल्या महाराष्ट्रात काही मान्सुमचा पाउस काही भागात मंदावला असला तरी राजस्थान आणि हिमाचल प्रदेशात त्याने बऱ्यांपैकी जोर धरला आहे.  सोमवारी घडलेल्या घटना त्याचेच प्रत्यंतर आहे.    प्रामुख्याने पावसाचा सुरवातीच्या काळात किंवा शेवटी वीज पडण्याचा घटना घडताना दिसतात. या काळात तप्त हवा आणि थंड हवा आकाशात एकमेकांना धडकतात. तप्त हवेचा दाब कमी  झाल्याने वर वर जाण्याचा प्रयत्न करतो तर थंड हवा दाब जास्त झाल्याने खाली येण्याचा प्रयत्न करते. यासर्व घडामोडीत ढगांमध्ये विद्युतप्रवाह निर्माण होतो. तो कसा होतो, याबाब...

भयानक वास्तवाकडे वाटचाल(भाग3)

इमेज
   सध्या आपल्या महाराष्ट्रात काही जिल्ह्यात कमी पावसामुळे चिंता निर्माण केली असताना जगात सुद्धा एक मोठी चिंता निर्माण होत आहे. ती चिंता आहे अफगाणिस्तानातील तालीबानचा वाढता प्रभाव. गेल्या आठवड्यापासून याबाबत 3 प्रमुख घडामोडी घडल्या. ज्यातील दोन भारताशी प्रत्यक्ष संबधीत आहेत, तर एक अप्रत्यक्ष संबधीत आहे. या सर्व घडामोडी एक जागरुक नागरीक आपणास माहिती असणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेवूया या घडामोडी . तर अफगाणिस्तानातील भारताचा कान्सुलेट बंद करणार नाहीत असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून जाहिर होवून तीन ते चार दिवस होत नाही तोच रविवार11 जूलै रोजी सायंकाळी अफगाणिस्तानमधील भारताच्या कंदहार कान्सुलेटमधून 50 भारतीयांना माघारी बोलवल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून जाहिर करण्यात आले.【 एखाद्या दूसऱ्या देशात आपल्या देशाचे पुर्ण अधिकार असलेले  राजनैतिक कार्यालय  असल्यास त्यास एँबसी म्हणतात. त्या ठिकाणी अँबेसिडर  हा अधिकारी असतो. याठिकाणी आपल्या देशात जाण्यासाठी लोकांना व्हिसा देणे ,आपल्या देशातील नागरीकांना मदत केंद्रे उभारणे तसेच अन्य परराष्ट्र संदर्भात कार्ये होतात. ...

बातमीतील पाकिस्तान [भाग 11 ]

इमेज
      आपल्या भारतात  केंद्रीय मंत्रिमंडळातील बदल , इंधनाचे वाढते दर  आणि या दरांमुळे वाढलेली महागाई , पावसाशी संबंधित  तसेच कोरोना लसीकरणाबाबत येणारी विविध आकडेवारी याच्या बातम्या माध्यमांमध्ये येताना आपल्या भारताचे शत्रू राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तानमध्ये 3 घडामोडी घडल्या . यातील दोन गोष्टी प्रत्यक्ष आपल्या भारताशी संबंधित आहेत तर एका गोष्टीशी त्याचा अप्रत्यक्ष संबंध आहेत . त्यामुळे त्या गोष्टी  माहिती  अत्यावश्यक आहे .चला तर मग जाणून घेउया या त्या गोष्टींविषयी .    आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला सुद्धा FATFच्या ग्रे यादीत टाकावे असी मागणी पाकिस्तानकडून जोरदारपणे करण्यात येत आहे. त्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्याचे जोरदार प्रयत्न सध्या पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. भारतात सुद्धा त्याचा पैसा दहशतवादासाठी वापरतो, असी सबब त्यासाठी पाकिस्तानकडून देण्यात येत आहे. पाकिस्तानने सयुक्त राष्टसंघाच्या सुरक्षा समितीतील कायमस्वरुपी सदस्यांकडे【P5】याबाबत मागणी केली आहे. लवकरच तो FATFकडे याबाबत तक्रार करेल.असी आशा आंतरराष्ट्रीय राजकारणातील तज्ज्ञ करत ...

भयानक वास्तवाकडे वाटचाल (भाग2)

इमेज
     दोन दिवसापुर्वी माझ्या अफगाणिस्तानमधील तालीबानच्या पोस्टवर प्रतिक्रीया देताना, काही जणांनी तालीबानच्या उदयाची पार्श्वभूमी माहिती करुन घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्यासाठी तालीबान मागची पुर्वपिठीका सांगणारी ही ब्लॉग पोस्ट . तर ज्या राजकीय अस्थिरतेमुळे अफगाणिस्तानात तालीबानचा उदय झाला, ती राजकीय अस्थिरता अफगाणिस्तानात तालीबानच्या उदय होण्याचा कितीतरी आधीच म्हणजे 1973 साली सुरू झाली. ज्यामध्ये अनेक घडामोडी घडत 1992च्या सुमारास तालीबानचा उदय झाला. गृहयुद्धानंतर 1996सप्टेंबर 26 या तारखेला काबूल तालीबानच्या हातात आले आणि अफगाणिस्तानचे सत्ताधीश तालीबान बनले, चला तर मग  जाणूया घेवूया हा घटनाक्रम.    1973 साली तत्कालीन राजा झाहीर शहा यांच्या सत्तेविरूद्ध त्यांचाच पंतप्रधान मोहमद्द दाऊद खान यांनी उठाव केला. (त्यावेळचे राजा झाहिर शहा हे नादीर शहा यांचे वंशज आहे. नादिर शहा यांनी 1771साली भारतावर आक्रमण केले होते. ज्या विरोधात मराठी भाषिक सैन्य भारतासाठी लढले होते.ज्याला आपण पानीपतचे तिसरे युद्ध म्हणतो) मोहमद्द दाउद खान यांनी राज्येशाही संपवून अफगाणी प्रजासत्त...

विलक्षण प्रतिभेचा, बहु आयामी , हळव्या मनाचा सिने दिग्दर्शक, सिने निर्माता..... गुरूदत्त

इमेज
    आपल्या बाँलीवूडमध्ये पुर्वी कार्यरत किंवा आता कार्यरत असणाऱ्या सिने दिग्दर्शक, सिने निर्मात्यांपैकी काही मोजकेच सिने निर्माते सिने दिग्दर्शक असे आहेत की,  ज्यांचे सर्वच्या सर्व चित्रपट कितीही वेळा बघीतले तरी कंटाळवाणे न होता, काहीतरी नविन बघत आहोत असे वाटते. दरवेळी चित्रपटातील कोणता तरी नवा पैलू आपणास गवसतो. अश्या मोजक्या सिने दिग्दर्शक सिने निर्मातांपैकी एक असणारे व्यक्तीमत्व म्हणजे वसंतकुमार शिवशंकद पदूकोन अर्थात गुरुदत्त .   अत्यंत हळव्या मनाचे, प्रतिभाशाली बहू आयामी सातत्याने नाविन्याचा ध्यास असणारे बाँलीवूडमधील सिने निर्माते सिने दिग्दर्शक म्हणून तै सुविख्यात आहेत.9जूलै ही त्यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली. आज गुरुदत्त यांना आपल्यामधून जावून 50 वर्षांपेक्षा अधिक कालखंड उलटला आहे. मात्र त्यांचे चित्रपट आज देखील काळजाला भिडतात, आपलेच जीवन तर चित्रपटात दाखवले नाही ना, असे वाटावे इतके सत्यदर्शनी चित्रपट त्यांनी दाखवले. चित्रपट निर्मितीसाठी त्यांनी सातत्याने आधूनिक तंत्रज्ञान वापरले. त्यासाठी त्यांनी पाश्चात्य देशांचे दौरै देखील केले. चित्रपटाच...

भयानक वास्तवाकडे वाटचाल

इमेज
आपल्या भारतात तसेच महाराष्ट्रात अनेक राजकीय लाथ्या उथाळ्यांनी वातावरण भंडावून सोडले असताना भारताच्या पश्चिमेकडील एका देशात फार तणावपूर्ण स्थिती आहे. तेथील जनता वेगाने मध्ययुगाकडे वाटचाल करत आहे. जर मध्ययुगात हा देश पुर्णतः पोहोचला तर त्याचे विपरीत परीणाम काश्मीर सह समस्त भारताला भोगावे लागतील. सध्या विविध आंतरराष्ट्रीय माध्यमात येणाऱ्या बातम्यांचा विचार करता ही स्थिती येत्या काही आठवड्यात फार उशीराचा विचार केला तर महिन्यात येवू शकते.मात्र  टायटँनिक या चित्रपटात दाखवलेल्या प्रमाणे जहाज बुडत असताना देखील शांतपणे संगीत वाजवण्यात दंग असलेल्या लोकांप्रमाणे भारतीयांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन असल्याने याबाबत आपणाकडे विचारमंथन करण्यात येत नाहीये.(तसा तो आपला राष्ट्रीय स्वाभाव आहे. भारताच्या इतिहासात आपणास अनेकदा त्याचे प्रत्यंतर दिसत) मी बोलत आहे अफगाणिस्तानविषयी. तिथे अत्यंत वेगाने वाढणाऱ्या तालीबानी प्रभावाविषयी.  या वर्षी 1मे पासून अमेरीकन.सैन्य अफगाणिस्तानमधून टप्याटप्याने माघारी जात असताना तालीबानच्या ताब्यातील प्रदेश वाढत आहे. जूलै च्या पहिल्या आठवड्यापर्यत एक तृतीयांश अफगाणिस...