पोस्ट्स

ऑगस्ट ३१, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

27 वर्षापूर्वीची ती काळरात्र

इमेज
                   दिनांक 1सप्टेंबर 2020 रोजी अनंत चतूर्दशी आहे, हे आपण जाणतातच. या दिवशी भगवान गणराय आपली पृथ्वीवरील यात्रा संपवून परत  कैलाशावर जातात, अशी मान्यता आहे . याच अनंत चतूर्दशीचा दिवशी आजपासून 27 वर्षापूर्वी म्हणजेच सन 1993 साली सप्टेंबर महिन्यात 30 या दिवशी गणपतीने कैलासला जाताना महाराष्ट्रातील अनेक लोकांना आपल्या बरोबर नेले , लातूरचा भुकंप म्हणून ही घटना सगळ्यांना माहिती आहे .             मित्रांनो 25 वर्षाची एक पिढी मानण्यात येते, या हिशोबाने लातूर किल्लारीचा भुकंप होवून एका पिढीचा कालावधी उलटून गेला आहे .यामध्ये सदर परीसर पुर्णपणे बदलला गेला आहे , यात शंकाच नाही . मात्र या भुकंपात अनेक कुटुंबातील एखाद दुसऱ्याचा अपवाद वगळता सर्वचा सर्व व्यक्ती मृत्युमुखी पडलेल्या होत्या . 20व्या शतकातील सर्वात मोठ्या दुर्घटनेत या भुकंपाचा विचार होतो. तिथीने 27वर्षे पुर्ण झाल्याबद्दल यात मृत्युमुखी पडलेल्या ,आत्पेष्ठ गमवलेल्या सर्वांना आदरांजली.          लातूर किल्लारी परीसराला लागून असलेल्या कर्नाटक राज्यातील धारवाड या परीसरात भुगर्भात असणाऱ्या फटीमुळे (जी धारवाड फाँल्ट म्हणून ओळखली जात