अखेर नमले !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर चर्चेत असणारे कृषी कायदे असल्याचे जाहीर केले . चालू महिन्यचा अखेरीस होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या बाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी टीव्हीवरील आपल्या संबोधांत जाहीर केले. संसदेत पारित केलेल्या कायद्याना मागे घेण्यासाठी संविधानातील २४५ कलमाचा आधार घेऊन रद्द करता येते . त्याच तरतूनुसार हे कायदे रद्द होतील . ज्या प्रमाणे कायदे पारित करण्यासाठी संसदेत कार्यवाही झाली त्याच प्रकारची कार्यवाही हे रद्द करण्यासाठी होईल, म्हणजेच संसदेच्या दोन्ही सभागृहात या बाबत चर्चा आणि मतदान होऊन हे कायदे रद्द होतील. गेल्या पावणेदोन वर्षापासून पंजाब राज्यातील शेतकरी पंजाब राज्य आणि देशाच्या राजधानीत दिल्लीच्या सीमेवर हे कायदे रद्द करण्यासाठी आंदोलने करत होते. त्यांच्या हा विजय मानला जात आहे .आंदोलकांनी हे कायदे पूर्णतः रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे जाहीर केले आहे . या कायद्याविरद्ध चालणाऱ्या आंदोलनावर जागतिक स्वरावर प्रतिक्रिया उमटल्या .कॅनडा देशातील खासदारानी या बाबत जाहीर विरोध केलाय होता या आदो