पोस्ट्स

मे २३, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत मालदीव संबंध नव्या वळणावर

इमेज
                       सध्या आपल्या भारताचे  शेजारी देशांशी असणारे संबंध मोठ्या प्रमाणात बदलत आहेत . हे बदल सकारात्मक तसेच नकारात्मक देखील आहेत . जसे नेपाळ आणि चीनबरोबर आपले संबंध काहिस्या तणावपूर्ण अवस्थेतून जात आहेत , तर इस्लाम हा प्रमुख धर्म असणाऱ्या किंबहुना ज्या देशाच्या नागरिकत्वाच्या कायद्यात मुस्लिम धर्मीय असल्याशिवाय नागरिकत्व  मिळणार नाही , अशी तरतूद आहे , त्या  मालदीव बरोबर आपले संबंध मोठ्या प्रमाणात सकारत्मक आहेत . आणि हे संबंध अजूनच सकारत्मक होऊ शकतात . अशी भूमिका मालदीव या देशाने नुकतीच एका आंतरराष्ट्रीय मंचावर घेतली .  सध्या समस्त  मराठी वृत्तवाहिन्या करोनाविषयी  बातम्या देत असल्याने , ही घटना त्यांच्याकडून अनावधाने  सुटली . जर सध्या करोना  नसता तर ही बातमी मोठ्या प्रमाणात गाजली असती यात शंका नाही . मात्र करोनामुळे  ही बातमी गाजली नाही . तरी समर्थ रामदासस्वामी यांच्या , "जेजे आपणासी ठाव, ते सकलांसी सांगावे , शहाणे करुन सोडावे सकल जन " या उक्तीप्रमाणे त्याबाबतची माहिती आपणास देण्याकरता आजचा लेखन प्रपंच .                  तर नुकत्याच आँनलाईन पद्धतीने झाले