भारत मालदीव संबंध नव्या वळणावर
सध्या आपल्या भारताचे शेजारी देशांशी असणारे संबंध मोठ्या प्रमाणात बदलत आहेत . हे बदल सकारात्मक तसेच नकारात्मक देखील आहेत . जसे नेपाळ आणि चीनबरोबर आपले संबंध काहिस्या तणावपूर्ण अवस्थेतून जात आहेत , तर इस्लाम हा प्रमुख धर्म असणाऱ्या किंबहुना ज्या देशाच्या नागरिकत्वाच्या कायद्यात मुस्लिम धर्मीय असल्याशिवाय नागरिकत्व मिळणार नाही , अशी तरतूद आहे , त्या मालदीव बरोबर आपले संबंध मोठ्या प्रमाणात सकारत्मक आहेत . आणि हे संबंध अजूनच सकारत्मक होऊ शकतात . अशी भूमिका मालदीव या देशाने नुकतीच एका आंतरराष्ट्रीय मंचावर घेतली . सध्या समस्त मराठी वृत्तवाहिन्या करोनाविषयी बातम्या देत असल्याने , ही घटना त्यांच्याकडून अनावधाने सुटली . जर सध्या करोना नसता तर ही बातमी मोठ्या प्रमाणात गाजली असती यात शंका नाही . मात्र करोनामुळे ही बातमी गाजली नाही . तरी समर्थ रामदासस्वामी यांच्या , "जेजे आपणासी ठाव, ते सकलांसी सांगावे , शहाणे करुन सोडावे सकल जन " या उक्तीप्रमाणे त्याबाबतची माहिती आपणास देण्याकरता आजचा लेखन प्रपंच . तर नुकत्याच आँनलाईन पद्धतीने झाले