सिंहावलोकन २०२२ भारत आणि भारताचे शेजारी
सध्या चालू ग्रेनीयन कॅलेंडर संपण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक आहेत . त्यामुळे हे दिवस सरत्या वर्षाचा आढावा घेण्याचे आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये . हे सरते २०२२ वर्ष भारताच्या सीमा लागलेल्या देशांचा विचार करता अत्यंत वादळी ठरले . भारताच्या सर्व शेजाऱ्याच्या शी विविध बाबतीत भारताचा संबंध आला मालदीव या भारताच्या मुख्य भूमीच्या नैऋत्य दिशेला असलेल्या इस्लामिक देशाबाबरोबर भारताचे परराष्ट्र मंत्री २६ आणि २७ मार्च रोजी मालदीवच्या राष्ट्रपतींनी दिलेल्याआमंत्रणाचा स्वीकार करत दोन दिवशीय दौरा केला भारताचा बऱ्याच प्रमाणत संबंध आला २६ आणि २७ मार्च रोजी भारताचे परराष्ट मंत्री एस जयशंकर हे मालदीवच्या दौऱयावर होते परराष्ट्र मंत्र्यांच्या या दौऱ्यात द्विपक्षीय विकास सहकार्य, उद्घाटन/हस्तांतरण आणि मालदीवच्या सामाजिक-आर्थिक विकासाला हातभार लावणाऱ्या आणि तिची सुरक्षा वाढवणाऱ्या अनेक महत्त्वाच्या भारत-समर्थित प्रकल्पांच्या शुभारंभाशी संबंधित अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या ज्यानुसार मालदीवची राजधानी असलेल्या मले शहरापासून ५० किलोमीटर असलेल्या .अड्डू या शहरात भारताची वकिलात उभारली जाणार आहे य