रेल्वेतील बदलांची एक्सप्रेस सुसाट
मित्रांनो, सध्या आपण करोना, सुशांतसिंग राजपुत यांची आत्महत्या अश्या बातम्यांमध्ये गुरफुटुन गेलो असताना रेल्वेमध्ये अनेक दुरगामी परीणाम करणाऱ्या घटना घडत आहेत .ज्याचा येणाऱ्या भविष्यकाळात मोठ्या प्रमाणात परीणाम झाल्याशिवाय राहणार नाही. तरी त्या विषयी माहिती करुन घेण्यासाठी आजचे लेखन . मित्रांनो या लेखात मी तूमच्याशी तीन गोष्टींबाबत बोलणार आहे . त्यातील एक गोष्ट प्रत्यक्ष रेल्वेप्रवाश्यांचा बाबत आहे, तर अन्य 2गोष्टी रेल्वे कर्मचाऱ्यांशी संबधीत आहे. त्यातही कर्मचाऱ्यांशी सबंधीत एक गोष्ट सकारात्मक आहे, तर एका गोष्टीला नकारत्मक छटा आहे .पहिले प्रवाश्यांचा बाबतीत असलेली गोष्ट बघूया. तर करोना नंतरच्या काळात प्रवास करताना कमीत कमी मानवी संपर्क यावा या हेतूने रेल्वे आणि स्टेट बँक आँफ इंडिया या दोघांच्या सहकार्याने एक योजना सुरु करण्यात आलेली आहे, ज्या अंतर्गत स्टेट बँक आँफ इंडिया या बँकेचे रुपे कार्ड जर आरक्षणादरम्यान व्यवहार करताना वापरल्यास प्रवाशी भाड्यात 10% सुट देण्यात येणार आहे, आणि यावर आँनलाईन व्यवहारावर आकरण्यात येणारे 1% शुल्क देखील आकरण्यात येणार नाहीये. तसेच हे कार्ड वापरुन रेल्वे