अशांत लक्षव्दीप !
लक्षव्दीप भारताच्या पश्चिमेला लक्षव्दीप असणारा. केंद्रशासित प्रदेश . इतरवेळी फारशा बातम्यात न येणारा, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांच्या चातृर्यामुळे पाकिस्तानच्या नौदलापेक्षा पंधरा मिनिटे आधी आपले नौदल पोहोचल्यामुळे भारताकडे आलेला मुस्लिम बांधवांची वस्ती अधिक असलेला प्रवाळ या प्राण्यांमुळे तयार झालेला बेटांचा समूह म्हणजे लक्षव्दीप ( अंदमान निकोबार बेटे ही हिमालयाची उपशाखा असणाऱ्या एरोकॉन या पर्वतरांगेतील शिखरे आहेत ) { भारताच्या स्वतंत्रप्राप्तीच्या वेळी लक्षव्दीपकडे सुरवातीला भारत किंवा पाकिस्तान दोघांचे लक्ष नव्हते मात्र कालांतराने सरदार पटेलांचे याकडे लक्ष घेल्याने त्यांनी नौदल पाठवले जे पाकिस्तानच्या नौदलापेक्षा पंधरा मिनिटे आधी पोहोचले भारताच्या झेंडा बघून पाकिस्तानी नौदल परत गेले आणि भारताच्या नकाश्यात या बेटांचा समावेश झाला .} ज्यांची स्वातंत्रप्राप्तीवेळी संख्या 36 होती . मात्र नुकतेच समुद्रामुळे खनन झाल्यामुळे एक बेट पाण्याखाली गेल्यामुळे आजमितीस त्यांची संख्या 35 आहे . अशा एकुण जमिनीचे क्षेत्रफळाच्या विचार करता 32 चौरस किलोमीटर आहे