सिंहावलोकन २०२१ भारत आणि जग
सरते वर्ष २०२१ भारतासाठी खूपच महत्त्वाचे ठरले या वर्षी मॉरिशस , युनाटेड किंग्डम , रशिया ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांच्याबाबत भारताला अनुकूल अश्या अनेक घडामोडी घडल्या त्यामुळे या सरत्या वर्षात भारताचे पररराष्ट्र धोरण खूपच यशस्वी ठरले असे म्हटल्यास वावगे ठरू नये अशी स्थिती निर्माण झाले आहे वर्षाच्या सुरवातीलाच आपले परराष्ट्रमंत्री मंत्री एस जयशंकर यांनी आफ्रिका खंडातील माँरीशियस या देशाबरोबर व्यापारी करार केला या करारानुसार माँरीसियस आणि भारत या दोन देशांमध्ये काही वस्तूंवर करमुक्त आयात - निर्यात होवू शकते.माँरीसियस हा देश जगभरात ज्या गोष्टींची निर्यात करतो, त्यातील सुमारे 75% वस्तू यात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. ज्यांची एकुण संख्या 310पेक्षा अधिक आहे. या वस्तूंमध्ये सुकवलेले मासे, फळे, भाज्या, काही यंत्रसामुग्री या वस्तूंचा समावेश करता येईल.भारताचा विचार करता भारताकडून माँरीसियसला आयटी विषयक, तंत्रज्ञानविषयक, अवकाश संशोधकविषयक सेवा विनाअडथळा पुरवता येवू शकतील.भारताने या आधी या प्रकारचे करार आशियान संघटनेतील देश, युरोपीय युनियन, जपान आदी देशांबरोबर केला आहे.