पोस्ट्स

जुलै ३०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

6वर्षापुर्वीची ती काळरात्र

इमेज
             पावसाचे दिवस होते ते .  पावसाची अगदी मुसळधार बॅटिंग चालू होती . त्यामुळे सर्वच नदी नाल्यांना पूर आले होते . कोकणांत तर पाऊस आपले सर्वस्व ओतल्यासारखा पाऊस कोसळत होता . मात्र चाकरमाने याही पावसात आपले नित्य व्यवहार करतच होते . रहाटगाडगी कोणाला चुकलीये . या नित्यव्यवहाराच्या रहाटगाड्यासाठी तळकोकणातून म्हणजेच  रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून माणसे मुबईच्या दिशेने निघाले होते . काही कारणाने रेल्वेचे तिकीट न मिळाल्याने ती माणसे आपल्या एसटी बसच्या माध्यमातून प्रवास करत होती मुंबई गोवा या म्हणायला राष्ट्रीय महामार्ग  मात्र ज्याची अवस्था एखाद्या ग्रामपंचायतीच्या रस्त्यासारखीच आहे अश्या रस्त्यावरून प्रवास करत होती . पावसाची धुवाधार बॅटिंग सुरु असल्याने  समोरचे काही फारसे दिसत नव्हते जे थोडेफार दिसत होते त्यामध्ये सर्वत्र नुसते पाणी आणि पाणीच . गाडीने तळकोकण आणि उत्तर कोकण यांच्या सीमेपर्यंत प्रवास केला ही सीमा सावित्री नावाची नदी ठरवते समुद्राच्या दिशेने तोंड उभे करून राहिले तर उजव्या हाताला रायगड जिल्हा अर्थात उत्तर कोकण आणि डाव्या हाताला रत्नागिरी जिल्हा अर्थात तळकोकण अशी