भारताचे परसदार आणि भारत
सध्या भारताच्या शेजारील देशांचे भारतासी असणारे सबंध अत्यंत नव्या वळणावर आहेत. बांगलादेश , म्यानमार, भूतान, मालदिव, श्रीलंका आदी सर्वच देशांशी भारत नव्याने मैत्री विकसीत करत असल्याचे आपणास माहिती असेलच. यातील बांगलादेश आणि म्यानमार यांच्या बरोबरच्या भारताच्या मैत्रीसंबधी मी या आधीच लिहले आहेत. या लेखाच्या शेवटी त्या लेखाच्या लिंक दिलेल्या आहेत . जिज्ञासू त्या बघू शकतात. यावेळेस मी बोलणार आहे. मालदिव या राष्ट्राबरोबर असलेल्या भारताच्या मैत्रीबाबत.(भारताच्या मालदिव बरोबर असणाऱ्या मैत्री बाबत मी या आधी लिहले होते, ज्याची लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे) भारताची मालदिव बरोबर असणारी मैत्री नव्याने चर्चेत आली, ती 3 नोव्हेंबर 2020 रोजी असणाऱ्या मालदिवच्या व्हिटरी डे कार्यक्रमात मालदिवच्या राष्ट्रप्रमुख असणाऱ्या इब्राहिम मोहमद सोली यांनी केलेल्या विधानामुळे. सन 1988 च्या 3नोव्हेंबरमध्ये श्रीलंकेच्या एका मासेमारी करणाऱ्या नौकेने मालदिववर सशस्त्र हल्ला केला. त्यावेळेस भारताच्या नौदलाने त्याचा प्रतिकार करत त्यांंना धूळ चारली होती. म्हणून मालदिवच