या मुद्यांवर आपण मौन कधी सोडणार ?
सध्या आपल्या महाराष्ट्रात विविध राजकीय घडामोडीना वेग आला आहे . राजकीय नेते एकमेंकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे . विविध केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापर केल्याच्या आरोप सत्ताधिकाऱ्याकडून विरोधकांवर केला जात आहे विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून सत्ताधिकारी पक्षाच्या विविध नेत्यांवर भष्टाचाराचे अनेक आरोप करण्यात येत आहे या आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात एका महत्त्वाच्या प्रशांबाबत मात्र अनेकांकडून मौन बाळगले जात आहे . तो म्हणजे सध्याची कृषी क्षेत्राची स्थिती महाराष्ट्राच्या सन २०२१ -२२ च्या आर्थिक पाहणी अहवालात तृणधान्ये तकडधान्ये तेलबिया कापूस यांचे एकरी उत्पादन मोठ्या प्रमाणा घटल्यामुमुळे चिंता व्यक्त करण्यात आली होती कांद्याचे एकरी उत्पादन घटल्याचे एका पाहणी अहवालातून स्पष्ट झाले आहेच आर्थिक पाहणी अहवालात सांगितल्याप्रमाणे तृणधान्ये तकडधान्ये तेलबिया कापूस प्रमाण जरी लक्षणीय रित्या कमी झाले असले तरी यासारखी अनेक पिके या रांगेत आहेत मी कांदा खात नाही कांदा काही जीवनवश्यक गोष्ट नाही अशी भूमिका आपण कांद...