उत्तिष्ट जाग्रत प्राप्य वरान्निबोधत क्षुरस्या धारा निशिता दुरत्यया दुर्गं पथस्तत्कवियो वदन्ति
जूलै महिना सुरु झाल्यावर अनेक गोष्टीचे वेध लागतात जसे जून महिन्या त पुरेसा पाउस न झाल्यास शेतकऱ्यांना पुनर्पेरणीचे वेध लागतात . तर सध्याचा काळातील एकमेव महासत्ता (भारत चीन आगामी महासत्ता आहेत सध्या एकच महासत्ता असल्याचे मला वाटते )असणाऱ्या युनाटेड स्टेट्स आॉफ अमेरीकेला आपल्या स्वातंत्र्यदिनाचे अर्थात 4th जूलैचे वेध लागतात चार जुलै ही तारीख अजून एका महत्वाचा गोष्टीसाठी ओळखली जाते ती म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा पुण्यतिथीचा दिनांक म्हणून. 2019साली या गोष्टीला 117 वर्षे पुर्ण होतील. स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्क्रुतीला एका वेगळ्या उंचीवर जावून पोहचवले त्या आधी पाश्च्यात्य जगातात भारतीय संस्क्रुती च्या विषयी माहिती ऐवजी गैरसमजच जास्त होते . भारतीयांना पण वैदिक धर्माची नवी ओळख करुन दिली आजपण त्याचे नाव घेतले जाते यातच सर्व काही आले . त्यांनी केवळ आध्यात्मिक कार्यच केले असे नाही रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण मठ याच्या माध्यमातून समाजकार्य सुध्दा केले. त्या वेळच्या निद्रीस्त समाजाला जागृत करायचे महत्वाचे कार्य त्यांनी केले . पड्डूचेरीला ( जूने नाव पॉडेचरी )