स्मरण ऐतहासिक समुद्र उडीचे
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ऐकताच मन आदराने अणि आनंदाने भरून न येणारा खचितच एखादा मराठी माणूस असावा. सावरकरांचे संपूर्ण आयुष्यच धगधगते अग्निकुंड होते असे म्हंटल्यास ठरू नये . त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे त्यांनी त्यांना युनाटेड किंग्डम या देशातून भारतात आणताना फ्रांसच्या किनाऱ्यावर मारलेली उडी . 2019 या वर्षी या ऐतिहासिक उडीला 109 पूर्ण होत आहेत . याच उडीमुळे त्यांच्यावर हेगच्या आंतराष्ट्रीय न्यायालयात खटला चालला . मुक्ततेसाठी त्यांनी केलेला हा प्रयोग जरी दुर्दैवाने फसला असला तरी त्याचे मोल विसरता येण्यासारखे नाही . जर हा प्रयोग यशस्वी झाला असता तर भारताला स्वातंत्र्य बऱ्याच आधी मिळाले असत कदाचित देशाची फाळणी सुद्धा रोखली गेली असती. मात्र आपल्या दुर्दैवाने हे घडले नाही. ऑनी बेझंट या सावरकरांना मदत देण्यात काही कारणाने कमी पडल्या आणि सावरकर ब्रिटिशांचा कैदेत पकडले गेले . आणि त्यांना 2 जन्मठेपेची 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. जगाच्या इतिहासात एक महत्वाची घटना म्हणून याकडे बघि