पोस्ट्स

एप्रिल २२, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मार बसल्यावरच जागे होणार का, आपण?

इमेज
       मार बसल्यावरच जागे होणार का, आपण? असे वाटावे, असे भारतीयांचे हवामान बदलाविषयीचे वर्तन असल्याचे वारंवार दिसत आहे. आजमितीस वाढत्या तापमानामुळे मेक्सिको या देशातील सरकारने त्यांचा देशात कामाचे फक्त पाच दिवस करण्याचे ठरवले आहे.दोन दिवस सुट्टी दिल्यामुळे लोक घराबाहेर कमी पडतील ,परीणामी तेथील सामान्य लोक सुर्याचा प्रकोपातुन वाचतील असा मेस्किकन सरकारचा कयास आहे.भौगोलिक क्षेत्राचा विचार करता, आपला भारत आणि मेस्किको हे दोन्ही देश उत्तर गोलार्धात उष्ण कटीबंधात प्रदेशात येतात. उत्तर गोलार्धात आता उन्हाळा सुरु असल्याने वातावरणात उष्मा आहे. तापमान रोज नवनवे उच्चांक स्थापित करत आहे. आपल्या भारतात राजस्थानातील चूरु आणि महाराष्ट्रात चंद्रपूर ही शहरे भयावह तापमान नोंदवत आहे. मात्र आपल्याकडे अजूनही बदलते हवामान हा विषय योग्य त्या गांभिर्याने घेतला जात नाहीये. नाही म्हणायला काही गैर सरकारी संस्था, सरकारचे काही विभाग हवामान बदलाविषयी जनजागृती करत आहेत. मात्र त्यांचे प्रयत्न जगभरात लहरी हवामान दाखवत असणारे प्रताप बघता अत्यंत तोकडे आहेत. मेस्किको ,  आदी लोकसंख्येची घनता आणि एकुणच लोकसंख्या विचार करता