भूकंपाचे संकट सामोरी
५ सप्टेंबर २०२२ च्या सकाळी चीनच्या आग्न्येय भागात शक्तिशाली म्हणता येईल असा साडेसहा रिक्टर स्केलचा भूकंप झाला आपल्या नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यात नव्याने भूकंपाचे छोटे छोटे धक्के बसत आहेत ,भूकंपाचे धक्के बसण्यासाठी नाशिकचा कळवण तालुका प्रसिद्ध होता आता या कळवण तालुक्याच्या ऐवजी या तालुक्याच्या शेजारील दिंडोरी तालुक्यात भूकंपाच्या केंद्रबिंदु सरकल्याचे बोलले जात आहे .सध्या विविध अंतरराष्ट्रीय माध्यमांच्या बातम्या बघितल्यास जगभरात भूकंपाच्या धक्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे गेल्या काही महिन्यात आठवाड्यत किमान एक मध्यम ते मध्यम आणि तीव्र याच्या सीमेवर रिक्टर स्केल असणारा भूकंप होत आहे जगभरातील भूगर्भ शास्त्रज्ञ यामुळे अत्यंत चिंतेत आहेत . या पार्श्वभूमीवर भारतात मात्र कमालीची शांतता अनुभवायास मिळत आहे शासनस्तरावर नियोजन सुरु असले तरी हे नियोजन लोंकांबाबत आहे ते लोक या बाबाबत खूपच बेपर्वा दिसत आहे जे अत्यंत धोक्याचे आहे . या धोक्याबाबबत अजूनही समाजात पुरेशी चर्चा होत नहिये कोणतीही गोष्टयशस्वी होण्यासाठी शासनस्तरावरील उपक्रमांखेरीज सर्वसामान