मुंढे पर्वचा अस्त
ज्याचे कुणाशीच पटत नाही , अश्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातच दोष असतो . या अर्थाचे एक दासबोधात वचन आहे. हे सांगायचे कारण की नुकतेच माजी झालेले नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे . यांची झालेली बदली . आपल्या भारतात लोकशाहीचे ४ स्तंभ आहेत . श्री तुकाराम मुंढे ज्या यंत्रणेचे भाग आहेत ती प्रशासन व्यवस्था ,त्यातीलच एक . मात्र त्यांचे त्यांनी जिथे इथे कार्य केले त्या प्रत्येक स्थानिक लोकप्रतिनिधींसी व्यवस्थेशी त्यांचे खटके उडाले . जे माझ्या मते सर्वथा अयोग्य आहे. एका ठिकाणचे लोकप्रतिनिधी सडके असू शकतात . मात्र सर्वच लोकप्रतिनिधी चुकीचे हे सर्वथा ना पटणारेच आहे. भारताच्या ४ लोकशाही स्तभांपॆकी एका स्तंभाच्या हा पूर्णपणे अपमान ठरतो . भलेही तुकाराम मुंढे चांगले करण्यासाठी धडपड असतील मात्र कोणतेही कार्य करण्याची एक प्रक्रिया असते . जी नाशिक महानगरपालिकेत पाळली गेली नाही द्योतक आहे असे मला वाटते . एका अधिकाऱ्याने केलेली आत्महत्या असो की एक अधिकाऱ्याचे पलायन असो ही सर्व याचेच आहे . त्यांनी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना विश्वासात घेणे आ