संसद हल्याच्या निमित्याने
आज १३ डिसेंबर २०१८ . आजच्याच दिवशी १७ वर्षांपूर्वी म्हणजे १३ डिसेंबर २००१ ला पाक पुरस्कृत जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर भ्याड हल्ला केला . खासदारांच्या गाडीवर असणारे स्टिकर आपल्या गाडीवर लावून आलेल्या अतिरेक्यांनी संसंसदेवर हल्ला केला ज्यात एका पत्रकार २ संसदेच्या कर्मचाऱ्यांसह ७ जवान शहिद झाले. तर १८ जण जखमी झाले . यावेळी ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आपल्या सुरक्षा रक्षकांना यश मिळाले .तर एका अतिरेक्याने आत्मघातकी स्फोट करून स्वतःला उडवून दिले . देशाच्या सर्वोच्च ठिकाणी करण्यात आलेल्या या हल्याने त्यावेळी संपूर्ण देश हादरला होता कालांतराने या कटाची पाळेमुळे खणून काढत या काटातील सुत्र धार मूळचा काश्मिरी आणि दिल्ली येथील विद्यापीठातील प्राध्यापक अफजल गुरु .याला पकडून नंतर फाशी देण्यात आले . संसंदेवर हल्ला करून अतिरेक्यांनी भारताच्या सार्वभौमात्मवरच हल्ला केला होता. ज्याला आपल्या सुरक्षा यंत्रणांनी खोख उत्तर दिले . त्यावेळी संसदेचे हि