भारताची ताकद अखेर जगाला मानवीच लागली !
भारत उभरती महासत्ता आहे ,तिचे महत्व कमी करून, तिला जागतिक व्यासपीठावरून डावलून ,जगाचे घोडे पुढे चालू शकणार नाही याची अखेर उपरती झाल्याने जर्मनीकडून त्यांच्या देशात होणाऱ्या जी ७ या परिषदेच्या अधिवेशनासाठी अखेर भारताला बोलवणे आले . २६ आणि २८ जून २०२२ या दरम्यान जर्मनीतील बवेरियन आल्प्स च्या श्लॉस एल्मौ येथे हे अधिवेशन होईल हे जी ७ परिषदेच्या अधिवेशनाचे ४८ वे अधिवेशन असेल रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतरच्या काळात होणारे हे पहिलेच जी ७ चे अधिवेशन असेल . भारताने संयुक्त राष्ट्रसंघात रशियाविरुद्धच्या प्रस्तावावर पश्चिम युरोपीय देशांना पूर्णपणे अनुकूल होईल अशी भूमिका ना घेतल्याने या वेळेस भारताला जी ७ परिषेदेच्या अधिवेशनात सहयोगी सदस्य म्हणून बोलवायचे का ? यावरून ७ देशांमध्ये मतभेत झाले होते. मुख्य आयोजक असलेला जर्मनीचे मत भारताला न बोलवायचे असे होते त्यावरून तीन महिन्यापूर्वी बराच वादंग झाला होता .अखेर अंत भला तो सब भला या हिंदी वावयप्रचारानुसार जी ७ च्या ४८ व्य अधिवेशनासाठी भारताला आमंत्रण देण्याचे ठरले २६ ते २७ जून दरम्यान जर्मनीत होणाऱ्या अधिवेशनासाठीपंतप्र