जरी झाली आपणास जाउनी वर्षे 99
या वर्षी एक ऑगट रोजी येणारी लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी अत्यंत विशेष असणार आहे . कारण त्या पुण्यतिथीपासून लोकमान्य टिळकांच्या पुण्यस्मरण दिनाचे 100वे वर्ष सुरु होईल . लोकमान्य टिळकांचे निधन 1 ऑगस्ट 1920 ला झाले होते . शंभर वर्ष हा फार मोठा कालखंड झाला . त्यामुळे या पुण्यतिथीचे महत्व अन्यनसाधारण असणार आहे . लोकमान्य टिळकांनी भारताच्या स्वतंत्रलढ्यात फार मोठे योगदान दिले होते . ऑनी बेझंट या आयरिश स्वतंत्रलढ्यात महत्तवाची भूमिका बजावणाऱ्या महिला स्वातंत्र्यसैनिकेबरोबर त्यांनी होमरूल चळवळ ही सुरु केली . त्यांनी केसरी या वृत्तपत्राद्वारे सामाजात लढ्याची धार कायम तेवत ठेवली .त्यांच्या लेखनामुळे अनेकांना स्वतंत्रलढ्यात भाग घेण्यासाठी स्फूर्ती मिळाली . मुंबईमधील गिरणी कामगार बाबू गेनू घे त्यापैकी एक महत्वाचे नाव . . त्यांनी पुण्यात अनेक संस्थांची उभारणी केली . ज्या मध्ये डेक्कन प्रोग्रेसिव्ह सोसयटी ही प्रमुख संस्था आहे . अनेक महत्वाच्या महाविद्यालयाचे प्राचार्य पद भूषवले . सर परशुरामभाऊ हे महाविद्यालय त्यापैकीच एक . त्यांनी फक्त क्रांतिकारी विचारांना चालना दिली असे नव्हे , तर त्या