खैरात संपली गुणवत्ता घटली
आज लागलेल्या शालान्त परीक्षेच्या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या तीन ते चार वर्षांपासून देण्यात येणारी गुणांची खैरात या वर्षी कमी देण्यात आली . परिणामी यावर्षी गेल्या बारा वर्षातील उत्तीर्णांच्या निच्चांकांची नोंद करण्यात आली . जे एका अर्थाने योग्यच झाले . गुणवत्तेच्या सुजवटीला त्यामुळे काही प्रमाणात . आळा बसला . अन्यथा ही सुजवटी जर काही काळ अशीच सुरु राहिली तर भविष्यात या गोष्टीचे अनेक अनिष्ट परिणाम दिसून आले असते . गुणवत्ता यादी बंद करून देखील दहावीच्या परीक्षेला आलेले अवास्तव मह्त्व आणि त्यातून येणाऱ्या ताणाला विद्यार्थाना सामोरे जाण्यासाठी काहीशी सोपी केलेली परीक्षा पद्धती यामुळे गेल्या काही वर्ष[पासून अनेक उत्तीर्णांची संख्या फुगलेली दिसत होती . एकीकडे "स्वयंम", " प्रथम सारख्या समाजसेवी संघटनांचे शालेय गुणवत्तेबाबत झोप उडवणारे अहवाल येत असताना दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे डोळे दिसपवून टाकणारे निकाल यातील तफावत यामुळे कमी होईल अशी अशा करण्यास हरकत नसावी . विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण जास