आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी
आपल्या मराठीतील एक सुप्रसिद्ध म्हण म्हणजे "आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी". एखादी समस्या सोडवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना सोडून इतरच उपाययोजना करणे, यासाठी ही म्हण वापरली जाते. बंगळुरु येथील इंडियन इनस्टिट्युट आँफ सायन्स मधील वसतिगृहातील छतावरील पंखे काढून टाकण्याचा प्रकार बघितला, तर सध्या प्रशासनाकडून याच म्हणीसारखे वर्तन घडत आहे, असे म्हणावे लागेल. विद्यार्थी छतावरील पंख्यांचा वापर करत आत्महत्या करत असल्याने त्यांच्या आत्महत्येमागच्या कारणांचा शोध घेऊन ती दूर करण्याऐवजी ते छतावरील पंख्याचा वापर करतात. म्हणून छतावरील पंखे काढण्याचा प्रताप इंडियन इनस्टट्युट आँफ सायन्स प्रशासन करत आहे.पंखे काढल्यानंतर आत्महत्या थांबतील असे या प्रशासनास वाटते.मात्र सध्या असणारे छतावरील पंखे काढून टाकल्यास विद्यार्थी दुसऱ्या मार्गाचा अवलंब करत आत्महत्या करतील. मग ते पण तोडणार का? आणि पहिले साधन तोडल्यामुळे दुसऱ्या साधनाद्वारे आत्महत्या करण्यास सुरवात केल्यामुळे ते तोडणार असी साखळी किती दिवस चालणार ?असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे .मुळात विद्यार्थ्यांचा आत्महत्या रोखण्यासाठी म