जोशीमठाच्या आपत्तीतून आपण घ्यावयाचे धडे
उत्तराखंड राज्यातील जोशीमठ या शहरात भौगोलिक स्थितीमुळे झालेली आणीबाणीची स्थिती ऐव्हाना आपणास मोठ्या प्रमाणात माहिती झालेली असेल.विविध भुगर्भ शास्त्रज्ञांनी या आधी दिलेले सुरक्षेतेचे इशारे देखील आपणास माध्यमांमार्फत आपणास ठाउक असतील जोशीमठ येथील संकट भयानक आहेच ,यात शंकाच नाही. मात्र पुर्णतः जोशीमठ सारखेच नाही मात्र त्याच तीव्रतेचे संकट आपल्या महाराष्ट्रात आहे, ते म्हणजे कोकणाचे . कोकणचे भुगर्भ अत्यंत सुरक्षीत असले तरी सयुंक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणीय संघटनेने कोकणच्या पर्यावरणाचा समावेश पृथ्वीवरील अत्यंत संवेदनशील पर्यावरणात करण्यात केला आहे. कोकणात मोठे प्रकल्प नको असा अहवाल माधवराव चितळे आणि गाडगीळ समितीमार्फत आधीच देण्यात आला आहे. तरीदेखील काही प्रकल्प कोकणच्या माथी मारण्यात येत आहे. ज्यामुळे भविष्यात मोठी समस्या उभी ठाकली तर आश्चर्य वाटायला नको. उत्तराखंड राज्यात देखील या आधी देण्यात आलेले सुरक्षीतचे नियम पायदळी तूडवल्याचे परीणाम आपण बघत आहोतच. तोच धोका कोकणात देखील आहे. विकासाबाबत नव्याने विचार करायची वेळ आली आहे, हेच यातून सिद्ध होत आहे.