पोस्ट्स

जून २, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

........ तर पाकिस्तानचे तीन तुकडे होतील

इमेज
             ........  तर पाकिस्तानचे तीन  तुकडे  होतील हे विधान कोण्या एका भारतीयांचे नाहीये तर हे वक्तव्य केले आहे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे सध्याच्या राजनैतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते . या मुलाखतीत त्यांनी जर सध्याच्या केंद्र सरकारने आमची नव्या निवडणुका घेण्याची मागणी मान्य न केल्यास पाकिस्तानात गृहयुद्ध सुरु होऊ शकते ज्यामुळे पाकिस्तानचे खैबर ए पखवातुनावा ( ज्यास आता आता पर्यंत वायव्य सरहद्द प्रांत या नावाने ओळखले जात होते ) सिंधुदेश आणि बलुचिस्तान असे तीन भाग पडू शकतात अशी भीती व्यक्त केली आहे त्यांनी या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे पाकिस्तानचे सध्याचे केंद्र सरकार देशाची आर्थिक स्थिती हाताळण्यात पूर्णतः अपयशी ठरत आहे ज्यामुळे  ज्या देशांच्या प्रमुख धर्म इस्लाम आहे अश्या देशांची यादी केल्यास ज्या एकमेव देशाकडे अणुबॉम्ब आहेत त्या पाकिस्तानचे लष्कर आपले मनोधैर्य गमावू शकते ज्याचा शेवट पाकिस्तानचे त्रिभाजन होण्यात होऊ शकतो अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे त्यांनी या मुलाखतीत सांगितले आहे की , बाटलीतून जीन ( जीन हा त्यांचा