हेतू योग्य , कृती अयोग्य
सध्या महाराष्ट्रातील शैक्षणिक वातावरण विविध वादांनी गाजतंय , ज्यात इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमाचा विषय प्रमुख आहे . अभ्यासक्रमात गणित विषयातील क्लिष्टता दुर व्हावी या उद्देशाने संख्या शिकवण्याची पद्धत याचा मुळाशी आहे . या बाबत एका वाक्यात सांगायचे झाल्यास , हेतू चांगला प्रामाणिक आहे, त्याबद्दल शंका घेण्यास वावच नाहीत, मात्र हे राबवण्याची पद्धत पुर्णतः.अयोग्य आहे शिक्षणाद्वारे कमकुवत व्यक्तींचा क्षमता वाढवणे अपेक्षीत असताना, अस्तिवात असलेल्या क्षमतेला अनुसरुन अभ्यासक्रम राबवल्यास क्षमता अजून खालावेल मग त्या वेळेस दर्जा अजून खालवणार का ? हा प्रश्न आहे . क्षमता वाढवणे हाच एकमेव उपाय यावर आहे. आणि अश्या पध्द्तीने शिकलेले लोक आयष्यातील अडीअडचणींना तोंड देण्यास सक्षम होतील का ? मी एका ठिकाणी व्याख्यान ऐकलेले होते , त्यात त्यांनी सांगितले होते . आयुष्यातील अडचणींना घाबरायचे नसते तर त्यानं सामोरे जायचे असते . या छोट्या बाबींवर सोपा मार्ग शोधणारी ही पिढी अश्या संकटाना कितपत सामोरे जाऊ शकेल ? हा प्रश्न का निर्