पूर्व आणि पश्चिमेचा सेतू भारत
सध्या जगाचे राजकारण वेगाने बदलत आहे जागतिक राजकारणात मोठे मोठे गृप स्थापन होण्याऐवजी अनेक लहान लहान गृप स्थापन होत आहे फक्त ४ ते ५ देशांच्या सुद्धा एका गृप बनत आहे . पूर्वीप्रमाणेच याही जागतिक राजकारणाच्या बदलत्या स्थितीत भारताचे जागतिक राजकारणातील स्थान दिवसोंदिवस अधिक महत्त्वाचे होत आहे ,१४ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी इस्राईलमध्ये सुरु असणाऱ्या आय यु टू या गृपच्या अधिवेशनामध्ये ऑनलाईन माध्यंमांद्वारे साधलेला संवाद हेच स्पष्ट करत आहे . इंडिया ,इस्राईल , यूएस ( अमेरिका ) आणि युएई (दुबई शारजा ,अबुधावी ही प्रसिद्ध शहरे असणारा देश ) या चार सहभागी देशांच्या अद्याक्षरांवरून या गटाला आय टू यु टू हे नाव देण्यात आले आहे यातील टू हा शब्द २ हा अंक दर्शवतो . (इंगजीत दोनला टू म्हणतात ) तर आय हे अक्षर इंडिया आणि इस्राईल या दोन देशांचे प्रतिनिधित्व करते या दोन्ही देशांचे इंग्रजी स्पेलिंग आय या अक्षरापासून सुरु होते म्हणून आय २ तर यु हे अक्षर यूएस आणि युएई या दोन देशांचे प्रतिनिधित्व करते . अश्या प्रकारची संघटना स्थापन करावी . अशी संकल्पना भारताचे परराष्ट्र मंत्री एस