मुद्दा योग्यच पण ....
महाराष्ट्र शासनाने मराठीचा उत्कर्ष व्हावा यासाठी यापुढे सर्व दुकानाच्या पाट्या मराठीत असाव्यात, असा आदेश नुकताच काढला. मराठीचा विकासाबाबतची त्यांची भुमिका अभिनंदनास पात्र आहे मात्र पुढील गोष्टींचा देखील विचार करणे आवश्यक आहे असे मला वाटते सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे. या तंत्रज्ञानाच्या युगात ज्या भाषेत तंत्रज्ञान आहे, त्याच भाषेचा विकास होणार, हे जगजाहीर आहे, आणि या बाबत मराठीत प्रचंड अनास्था आहे. वाचलेले सहजतेने समजू शकते, अस्या मराठी भाषेत तंत्रज्ञानाची माहिती अच्युत गोडबोले यांच्या व्यतिरीक्त कोणी दिली आहे का ? याबाबत माहिती घेतल्यास समोर येणारे चित्र निराशाजनक आहे. रोजच्या व्यवहारात इंग्रजी शद्ब वापरले जात असताना संस्कृतप्रचूर शद्ब वापरून विषय समजून घेतल्याने काहीसी अडचण निर्माण होवू शकते. ती अडचण दाखवून त्यापुढचे व्यक्ती ती संकल्पना समजण्यासाठी इंग्रजीचाच आधार घेताना दिसते, त्यामुळे मराठीचा ज्ञानभाषा बनण्याचा मार्ग खुंटतो आज इंग्रजी समजण्यात येणाऱ्या अनेक संकल्पना जसे अल्फा, बीटा, लँमडा विविध ग्रहांची नावे ही लँटिन आहेत. मात्र ती इंग्रजीत सहजतेने स्विकरली