पोस्ट्स

मार्च २१, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत ऑस्ट्रेलिया सहकार्याचे नवे आश्वासक पर्व

इमेज
          येत्या काळात भारत जागचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे,  याची साक्ष देणाऱ्या घडामोडी सध्या घडत आहे.  १९ आणि २० मार्च रोजी जपानचे पंतप्रधान  फुमिओ किंशिंदा यांची दोन दिवशीय भारत भेट होऊन २४ तास होण्याच्या आतच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॊरिशन  यांच्याबरोबर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पध्द्तीने संवाद साधला जून २०२० मध्ये पहिल्यांदा दोन्ही देशांनी ऑनलाईन  संवाद साधल्यावर त्याच प्रकारे संवाद साधण्याची ही दुसरी वेळ होती पहिल्याऑनलाईन  बैठकीच्या वेळी साधलेल्या संवादाचा धागा यावेळी अजून पुढे नेण्यात आला . यावेळी विविध गोष्टींसाठी एकत्रितरित्या १५०० करोड भारतीय इतक्या रक्कमेची गुंतवणूक  ऑस्ट्रेलिया करणार असल्याचे  ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिशन यांनी जाहीर केले .       या भारतीय चलनातील १५०० करोडच्या मदतीमध्ये सौर पॅनल,  इलेट्रीक कार , मोबाईल या सारख्या उपकरणाच्या निमिर्तीसाठी अत्यंत महत्वाचा असणाऱ्या लिथियम सारख्या धातूच्या बाबत भारत सक्षम होण्यासाठी करावयाच्या संशोधनासाठी तसेच प्रदूषणविरहित ऊर्जा निर्मितीसाठी भारताची प्रगती होण्यासाठी १९३ करोड रुपयाची तरतूद केल

जागतिक वन दिवसाच्या निमित्याने

इमेज
सध्याच्या प्रचंड तापमानाच्या काळात आपणास एकच चर्चा ऐकू येते झाडे लावली पाहिजेत झाडे लावली पाहिजेत . झाडांमुळे पर्यावरणाचा समतोल टिकतो पर्यायाने हवेत गारवा टिकून रहातो ही या मागची कल्पना आहे .  मानवास हे वृक्षांचे महत्व फार आधीच समजले होते . त्या अनूषंगाने मानवाने पाउले देखील टाकण्यास सुरवात केली होती . त्याचीच फलनिष्पती म्हणजे जागतिक वन दिवस . जो आपण 21 मार्च रोजी साजरा करतो .  मानवी आयुष्यात वनांचे महत्व किती आहे हे आपणास तुकोबाराय आदी संताच्या अभंगातून लक्षात येतेच . संतांनी सांगितलेले हे  वृक्षांचे महत्व  आपण अनूभवू पण शकतो  उदाहरणार्थ महाराष्ट्रातील महत्तवाची समजणारी जाणारी पुणे आणि नाशिक ही शहरं घेयुया  पुणे आणि नाशिक दोन्ही समान शहरे किंबहूना पुणे अधिक जलदचं या दोन्ही शहरातून फेरफटका मारल्यास आपणास काय जाणवते ? नाशकात आपणास अधिक उन जाणवते त्या तूलनेत पुण्यात उन कमी जाणवते  पुणे अधिक प्रमाणात  ग्रीन हाउस गँसेसचे उत्सर्जन करत असून देखील आपणास हा फरक जाणवतो  . याचा मागचा कारणाचा शोध घेतला असता आपणास दिसते की पुण्याच्या आसपास असणार्या तळजाई पर्वती चर्तश्रुंगी आदि टेकड्यांवर  अद्याप अ