73 ची उमर गाठली
कविवर्य कुसुमाग्रज यांनी भारताच्या स्वातंत्र्यदिनला 50 वर्षे पुर्ण झाली , त्यावेळेस "स्वातंत्र्य देवतेची विनवणी " ही फटका या काव्यप्रकारातील कविता लिहली होती . त्याला 2019 या वर्षी २३ वर्षे पूर्ण झाली .साधारणतः २५ वर्षाची एक पिढी समजली जाते . त्यानुसार जवळपास एका पिढीचा कालावधी पूर्ण झाला आहे . त्या कवितेत त्यांनी त्यावेळच्या समस्यांचा उहापोह करत , स्वतंत्रदेवता या समस्यांकडे लक्ष द्या असे सांगत आहे अशी कल्पना करून भारताच्या तत्कालीन समस्या मांडल्या होत्या . आज एव्हढ्या वर्षांनंतरही आजची परिस्थिती बघत असताना असपणास स्पष्ट दिसते की , त्या समस्या अजूनही जैसे थेच आहेत .किंबहुना त्यांनी अधिकच आवक्राळविक्राळ स्वरूप धारण केले आहे ./ त्यांनी त्यांच्या कवितेत जाती व्यवस्थेवर , मराठी भाषेच्या सद्यस्थितीवर , महिलांच्या समस्येवर, नोकरशहांच्या कार्यप्रणालीवर , विविध ठिकाणी होणाऱ्या शोषणाच्या घटनेविरुद्ध , मराठी लोकांच्या अल्पसंतुष्ट राहण्याच्या प्रवृत्तीवर कोडगे मारले होते . आज त्यातील जाती व्यवस्था अधिकच घट्ट झालेली दिसते.