ब बुद्धिबळाचा (भाग 10)
सध्या आपल्या महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला असताना, भारतीय महिला बुद्धिबळपटू अत्यंत आश्वासक खेळ करत महिला बुद्धिबळ सांघिक विजेतेपद स्पर्धेत विजयाचा आशा टिकवून ठेवत आहे या स्पर्धेत सहभागी प्रत्येक संघ पाच साखळी फेरीचे फेरीचे डाव खेळणार आहे .यावेळी जिंकल्यास दोन गुण आणि डाव बरोबरीत सुटल्यास एक गुण संघाला मिळणार आहे .या पाच डावांनंतर उप उपांत्य फेरीचे सामने खेळवले जाणार आहे .जे या साखळी स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आठ संघामध्ये होणार आहे साखळी स्पर्धांमध्ये पाचव्या डावाच्या अखेरीस भारताने आपल्या गटात सात गूण प्राप्त करत आपले उप उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे . आजमितीस पाच फेऱ्यांमध्ये भारताचे सात गूण झाले आहेत दहा गुणसह रशिया भारताच्या गटात अव्वल स्थानी आहे. भारताच्या गटात आर्मेनिया रशिया आणि अझरबैजान यांनी बाद फेरीत प्रवेश केला आहे . भारताचा समावेश A गटात केला आहे . दुसऱ्या B गटात जार्जिया अव्वल स्थानी आहे या गटात फिडे अमेरिकन, युक्रेन काझकिस्तान यांनी बाद फेरीत प्रवेश केला आहे तर A गटातील फ्रांस आणि स्पेन या देशांचे साखळी स्पर्धेत गुण कमी झाल्याने त्या