सामाजिक वनीकरणात दुर्लक्षीलेले जाणारे मुद्दे आणि पर्यावरणीय हानी
सध्या अनेक ठिकाणी सामाजिकरित्या वनीकरण केले जात आहे . समाजाच्या वनीकरणातील सहभाग कौतुकास्पद असला , तरी या सामाजिक वनीकरणात काही मुद्दे अज्ञानामुळे दुर्लक्षले जात आहे , ज्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे . त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर असा परिणाम होत आहे . त्यामुळे हे टाळणे अत्यावश्यक आहे . हे टाळण्यासाठीचा पहिला प्रयत्न म्हणजे असे मुद्दे समजून घेणे जे यामध्ये अंतर्भूत आहेत . यातील पहिला मुद्दा म्हणजे सामाजिक वनीकरणात वापरली जाणारी वृक्षे . सामाजिक वनीकरणात प्रामुख्याने लवकर वाढणारी झाडे लावली जातात . ज्यामध्ये अनेकदा निलगिरी सारख्या परदेशी वृक्षाची निवड केली जाते . जे चुकीचे आहे . या परदेशी झाडांवर पक्षी बसत नाहीत . त्यामुळे पक्ष्यांना या झाडांचा काहीही उपयोग होत आंही . मात्र त्यांच्या नैसर्गिक अधिवास मात्र नष्ट झाला असतो .त्यामुळे पक्ष्यांची संख्या मात्र कमी होते . जे पर्यावरणाला हानी पोहचवणारे असते . तसेच या झाडांमुळे जमिनीचा पोत देखील बदलतो . आपण वड ,पिपंळ , आंबा , साग शिसव अशी भारतीय झाडे लावू शकतो . या विषयी अधिक माहिती आपण कोणत्याही पर्यावरण त