जब हमने दुनिया मांगी काटोंका हार मिला
चित्रपट हे समाजाचे मनोरंजन करतानाच प्रबोधनाचे उत्कृष्ट माध्यम आहे याची जाण भारतातल्या अत्यंत मोजक्या सिने निर्मात्यांना आहे , असे अत्यंत खेदाने खेदाने म्हणावे लागते लागते . या मोजक्या सिने निर्मात्यांमध्ये गुरुदत्त यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल . 9 जुलै हा त्यांचा जन्मदिवस त्याप्रत्यर्थ त्यांना विन्रम आदरांजली . गुरुदत्त यांनी भारतीय सिनेश्रुष्टिला वेगळयाच उंचीवर नेऊन पोहचवले त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या सिने निर्मितीत केला . त्यासाठी त्यांनी पाश्चात्य देशांचे दौरे देखील केले . मानवी आयुष्यातील दुःखांना रुपेरी पडद्यावर चित्रित करणे आणि त्यातून समाजाचे प्रबोधन करत मनोरंजन करणे यात त्यांचा कोणी धरू शकणार नाही . दुर्दैवाने त्यांचे अकाली वयाच्या ३९ व्या वर्षी निधन झाले त्यांचा 20 वर्षाच्या सिने कारकीर्दीतील शेवटची 10 वर्षे अत्यंत मह्त्तवाची आहेत . त्याचा विवाह, त्यांचे असफल प्रेमप्रकरण आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू सारे काही त्या दहा वर्षात घडले . सिने श्रुष्टीतील क्षणाभराची प्रसिद्धी कथन करणारा कागज के फुल हा चित्रपट अजो भी सो कि