गेली ती नाशिक पुणे रस्त्यातील रंजकता
आजचीच गोष्ट आहे. सहजच व्हाँटसपवर बघत असताना एका व्हाँटसप ग्रुपवर एक पोस्ट दिसली.पोस्टमध्ये मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर झालेले बदल आणि त्यामुळे प्रवाश्यातील मज्जा कशी संपली, हे सांगितले होते. पोस्ट वाचल्यावर मी सातत्याने प्रवास करत असलेल्या नाशिक पुणे रस्त्यातील गेल्या काही वर्षापासुन झालेले बदल डोळ्यासमोरुन झरझर जावू लागले. ते आपणापर्यत पोहचवण्यासाठी आजचे लेखन . नाशिक पुणे रस्त्यातील चंदनापरी घाटाची मज्जा काही औरच असायची. तेथील वेडीवाकडी वळणे, गणपतीची मुर्ती याची गंम्मतच काही और होती. नाशिककडून येताना घाटातील अवघड टप्पा चांगल्या पद्धतीने पार पडल्याबद्दल आभार मानायला आणि पुण्याकडून येताना हा टप्पा चांगला पार पडण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी अनेकांचे हात सहजतेने जोडले जात असे .मी गमतीने मनोमनी घाटात घाट चंदनापुरी असे माझ्या मित्रांना म्हणत असे.चंदनापुरी घाटातून पुण्याकडे जाताना दिसणारे नेढे(डोंगराला पडलेले भोक ज्यातून आरपार जाता येईल असे मोठे छिद्र ). तर पुण्याकडून नाशिकला येताना अवघड वळणानंतर डाव्या बाजूला दिसणारी इंग्रजी व्ही आकाराची चढण, तर यापुर्वी या परीसरात