पोस्ट्स

मालदीव लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भारताचे बदलते परराष्ट्र धोरण

इमेज
मालदीव , आपल्या भारताच्या नैऋत्य दिशेला असणारे शेजारचे राष्ट्र . जागतिक राजकारणाचा विचार करता , अत्यंत महत्त्वाचा ठिकाणी वसलेले विविध बेटांच्या स्वरुपातील राष्ट्र असणारे मालदिव आपल्या न्यूजमध्ये फारसे नसतेच . भारताचा महत्तवाचा सहभाग असलेल्या सार्क आणि बिमस्टेक मधील भारताचा अत्यंत विश्वासू साथीदार ज्याने पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील काश्मीरविषय रडारडीला स्वतः इस्लामाधारीत राष्ट्र असून देखील नेहमीच विरोध केला आहे . तो देश म्हणजे मालदिव . तर अस्या मालदिवचे राष्टपती इब्राहिम मोहम्मद सोलिह आँगस्टच्या पहिल्या आठवड्यात चार दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत .      या दौऱ्यावर दरम्यान मालदिव आणि भारताचे दळणवळाच्या पायाभुत सोईसुविधांची निर्मिती , सायबर सिक्युरिटी , पारंपरिक शस्त्रसज्जता , व्यापार आणि सांस्कृतिक सबंध   विविध सहा बाबींवर करार करण्यात आले . या अंतर्गत भारत मालदिवची राजधानी माले , राजधानी शेजारच्या बेटांशी जोडण्यासाठी एकुण साडेसहा किलोमीटरचा पुल बांध...

जागतिक राजकारणातील महत्त्वाचा देश भारत

इमेज
         येणारा काळ हा भारताचा असेल असे  म्हटल्यास वावगे ठरू नये अश्या घडामोडी सध्या  घडत असलेल्या भारताच्या संदर्भातील  परराष्ट्रीय  घडामोडी बघितल्यास सहजतेने लक्षात येते . गेल्या पंधरा दिवसात जपानचे पंतप्रधान दोन दिवशीय भारत दौऱयावर आले   . चीनचे परराष्ट्र मंत्री देखील त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रम नसताना सुद्धा त्यांनी भारताला भेट दिली . ऑस्टेलिया या देशाच्या पंतप्रधानांनी ऑनलाईन परिषदेत उपस्थित राहताना भारताला अनुकूल असे अनेक करार केले . तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात इस्राईलचे पंतप्रधान भारताच्या तीन दिवसाच्या दौऱयावर येणार आहेत हे कमी काय म्हणून इस्राईलचे पंतप्रधान भारताच्या दौऱयावर असताना नेपाळचे पंतप्रधान देऊबा देखील यावेळी तीन दिवसाच्या भारताच्या दौऱयावर असणार आहेत  नेपाळचे पंतप्रधान १ एप्रिल ते ३ एप्रिल या दरम्यान भारताच्या भेटीवर असतील याच दरम्यान २६ मार्च ते ३० मार्च या दरम्यान मालदीव आणि श्रीलंका देशाच्या परराष्ट्र खात्याच्या आमांत्रणवरून भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर मालदीव या देशाच्या...

मालदीवमधील भारतविरोधी सूर

इमेज
            मालदीव भारताच्या पश्चिमेला असणारे सुन्नी इस्लाम हा प्रमुख धर्म असणारे १ हजार बेटावर वसलेले राष्ट्र. आशिया खंडातील क्षेत्रफळाने अत्यंत कमी असणाऱ्या देशांच्या यादीत क्रमांक २ वर असणारे  (पहिल्या क्रमांकावर कतार तर तिसऱ्या क्रमांकावर सिंगापूर) अरबी समुद्रात वसलेले राष्ट्र . जागतिक हवामान बदलामुळे सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या राष्ट्रांपैकी एक म्हणजे मालदीव . . बांगलादेशच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या सार्क या संघटनेतील भारताचा सहकारी म्हणजे मालदीव श्रीलंकेने आक्रमण केल्यावर ज्या देशाला भारतीय नौदलाने स्वतंत्र केले तो म्हणजे मालदीव  तर अश्या मालदीवमध्ये २०१३ ते २०१८ या काळात देशाच्या अध्यक्षस्थानी राहिलेल्या अब्दुला यामिन यांच्या नेतृत्वात भारतविरोधी आंदोलन सुरु आहे त्यांचे समर्थक मालदीवमध्ये  ठिकठिकाणी  घेऊन शर्टावर Get Out India असे लिहून Get Out India असे फलक घेऊन मालदीवमध्ये उभे आहेत.  मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष  हे त्यांच्या भारतविरोधी आणि चीन समर्थक भूमिकेसाठी ओळखले जातात मात्र मालदीवचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष...

भारताचा शेजारी देशातील डंका

इमेज
आपल्या भारतात इंधनाच्या किमतीने मागील कित्येक वर्षातील किमतीचे रेकाँर्ड मोडले असताना, भारताच्या सभोवताली  आंतरराष्ट्रीय राजकारणातील  2  घटना नुकत्याच घडल्या. त्यातील एक घटना भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्व वाढवणारी आहे.तर दुसरी साधरण घटना आहे. याविषयी माहिती देण्यासाठी आजचे लेखन. पहिले साधरण घटना बघूया. तर मित्रांनो, आपल्या भारताच्या दक्षीणेला असणाऱ्या श्रीलंकेने संयुक्त राष्ट्रसंघातील मानवाधिकाराच्या बाबतीत आपली बाजू भारताने उचलावी, यासाठी साकडे घातले आहे . तसेच श्रीलंकेने त्यांचा दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना त्यांचा केंद्रीय विधीमंडळात भाषण करण्यास आधी परवानगी दिली असता नंतर मनाई केली . श्रीलंकेने यासाठी करोना संसर्ग पसरु शकतो, हे कारण पुढे केले आहे. मात्र आंतरराष्ट्रीय माध्यमांनुसार इम्रान खान त्यांचा काश्मीरविषयक राग तिथे आवळलू शकतात, जे श्रीलंकेला अडचणीचे ठरु शकते असे वाटल्याने श्रीलंकन सरकारने त्यांना मनाई केली,असो  त्याचप्रमाणे श्रीलंकेने त्यांचा देशात सिंहली आणि तामिळी असा संघर्ष टोकाला गेलेला असताना संघर्ष मिटवण्यासाठी उपाययो...

भारताचे परसदार आणि भारत

इमेज
                      सध्या भारताच्या शेजारील देशांचे भारतासी असणारे सबंध अत्यंत नव्या वळणावर आहेत. बांगलादेश , म्यानमार,  भूतान, मालदिव, श्रीलंका आदी सर्वच देशांशी भारत नव्याने मैत्री विकसीत करत असल्याचे आपणास माहिती असेलच. यातील बांगलादेश आणि म्यानमार यांच्या बरोबरच्या भारताच्या मैत्रीसंबधी मी या आधीच लिहले आहेत. या लेखाच्या शेवटी त्या लेखाच्या लिंक दिलेल्या आहेत . जिज्ञासू त्या बघू शकतात. यावेळेस मी बोलणार आहे. मालदिव या राष्ट्राबरोबर असलेल्या भारताच्या मैत्रीबाबत.(भारताच्या मालदिव बरोबर असणाऱ्या मैत्री बाबत मी या आधी लिहले होते, ज्याची लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे)                           भारताची मालदिव बरोबर असणारी मैत्री नव्याने चर्चेत आली, ती 3 नोव्हेंबर 2020 रोजी असणाऱ्या मालदिवच्या व्हिटरी डे कार्यक्रमात मालदिवच्या राष्ट्रप्रमुख असणाऱ्या इब्राहिम मोहमद सोली यांनी  केलेल्या विधानामुळे. सन 1988 च्या 3नोव्हेंबरमध्ये श्रीलंकेच्या एका मासेमार...

भारत मालदीव संबंध नव्या वळणावर

इमेज
                       सध्या आपल्या भारताचे  शेजारी देशांशी असणारे संबंध मोठ्या प्रमाणात बदलत आहेत . हे बदल सकारात्मक तसेच नकारात्मक देखील आहेत . जसे नेपाळ आणि चीनबरोबर आपले संबंध काहिस्या तणावपूर्ण अवस्थेतून जात आहेत , तर इस्लाम हा प्रमुख धर्म असणाऱ्या किंबहुना ज्या देशाच्या नागरिकत्वाच्या कायद्यात मुस्लिम धर्मीय असल्याशिवाय नागरिकत्व  मिळणार नाही , अशी तरतूद आहे , त्या  मालदीव बरोबर आपले संबंध मोठ्या प्रमाणात सकारत्मक आहेत . आणि हे संबंध अजूनच सकारत्मक होऊ शकतात . अशी भूमिका मालदीव या देशाने नुकतीच एका आंतरराष्ट्रीय मंचावर घेतली .  सध्या समस्त  मराठी वृत्तवाहिन्या करोनाविषयी  बातम्या देत असल्याने , ही घटना त्यांच्याकडून अनावधाने  सुटली . जर सध्या करोना  नसता तर ही बातमी मोठ्या प्रमाणात गाजली असती यात शंका नाही . मात्र करोनामुळे  ही बातमी गाजली नाही . तरी समर्थ रामदासस्वामी यांच्या , "जेजे आपणासी ठाव, ते सकलांसी सांगावे , शहाणे करुन सोडावे सकल जन " या उक्तीप्रमाणे त्याबाब...