पोस्ट्स

जुलै २६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पंडीत नेहरुंचे हे थोरपणच !

इमेज
    आपल्या भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मु यांनी नुकतीच शपथ घेतली. त्या आदिवासी (वनवासी) समाजाच्या आहेत. या समाजातून देशाच्या सर्वोच्च संविधानिक पदावर जाणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती आहेत. आतापर्यत आपल्या भारतात अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिम समाजबांधवातून ,तसेच शीख धर्मियातून ,दलित समाजबांधवातून आणि अत्यल्प असणाऱ्या ख्रिचन समाजबांधवातून आलेल्या व्यक्तींनी राष्ट्रपती पद भुषवले आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात लोकशाही किती खोलवर रुजली आहे, याचे हे उत्तम उदाहरण आहे. लोकशाही इतक्या खोलवर रूजवण्याचे काम करणाऱ्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहारलाल नेहरु आणि अन्य तत्कालीक नेत्यांचे आपण कायमच कृतज्ञ असू. दुसऱ्या महायुद्धानंतर पुढच्या तीन ते चार वर्षांत जगभरात सुमारे 90 देश वसाहतवादाच्या रोखडातून मुक्त झाले.या स्वातंत्र्य झालेल्या देशांनी लोकशाहीची विविध रूपे स्विकारली. आज सुमारे 75 वर्षानंतर या देशातील लोकशाही कोणत्या टप्प्यावर आहे? आणि भारतातील लोकशाही कोणत्या टप्प्यावर आहे? याचा विचार करता आपणास स्वातंत्र्योत्तर भारतात लोकशाहीची पायाभरणी करणाऱ्या पंडीत नेहरु यांच्यासह तत्काल