जाने क्यू ?
दिनांक ९ आणि १० जूनला ला मला माझे दोन जूने सध्या संपर्कात नसणारे मिञ भेटले होते त्यातील एकाशी माझा एकाशी चांगली मैञी होती. तर एकाशी सर्वसाधरण मैञी होती. सर्वसाधरण मैञी असणाऱ्या मिञाचा महाविदयालयीन अभ्यासात एक विषय कच्चा होता, तर दुसरा विषय माझा कच्चा होता. एकमेकांचे कच्चे विषय माञ दुसऱ्याचे हुकुमी विषय होते . त्यामुळे अभ्यासात मदत करताना आमची मैञी झाली. कांलातराने महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर आमचे भेटणे कमी होत होत बंद झाले, आणि जवळपास 4वर्षांनी तो मला भेटला. दुसऱ्याची मेञी माञ सहज अश्या कोणत्याही कारणाविना झाली होती, हा मिञ माझे महाविद्यालयीन शिक्षण संपून 5वर्षे झाले तरी अजून चांगल्या संपर्कात आहे . जरी प्रत्यक्ष भेटणे होत नसले तरी व्हॉटसप फेसबुक, एस एम एस च्या माध्यमातून संपर्कात आहे तर हे दोन्ही मिञ मला अचानक भेटले. दोन्ही वेळेस आम्ही हॉटेलमध्ये गेलो ज्या मिञासी अभ्यासातील काठिण्यामुळे मैञी झाली होती त्याच्याशी गप्पा फारशा रंगल्या नाहीत या उलट दुसऱ्या मिञासी प्रचंड प्रमाणात गप्पा रंगल्या . तेव्हा पासून माझ्या