स्मरण ऐतिहासिक समुद्र उडीचे
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ऐकताच मन आदराने अणि आनंदाने भरून न येणारा खचितच एखादा मराठी माणूस असावा . सावरकरांचे संपूर्ण आयुष्यच धगधगते अग्निकुंड होते असे म्हंटल्यास ठरू नये . त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे त्यांनी त्यांना युनाटेड किंग्डम या देशातून भारतात आणताना फ्रांसच्या किनाऱ्यावर मारलेली उडी . २०२२ या वर्षी या ऐतिहासिक उडीला ११२ पूर्ण होत आहेत . याच उडीमुळे त्यांच्यावर हेगच्या आंतराष्ट्रीय न्यायालयात खटला चालला . एका भारतीय व्यक्तीचा ताबा आपल्याला मिळावा यासाठी दोन युरोपीय राष्ट्र्रानी आंतराष्ट्रीय न्ययालयात दाद मागण्याचा जगातील हा बहुतेक एकमेव उदाहरण असावे . मुक्ततेसाठी त्यांनी केलेला हा प्रयोग जरी दुर्दैवाने फसला असला तरी त्याचे मोल विसरता येण्यासारखे नाही . जर हा प्रयोग यशस्वी झाला असता तर भारताला स्वातंत्र्य बऱ्याच आधी मिळाले असते मात्र आपल्या दुर्दैवाने हे घडले नाही . ऑनी बेझंट या सावरकरांना मदत देण्यात काही