भारत जपान आणि भारत बांगलादेश मैत्रीचे नवे सेतू
सध्या मराठी आणि हिंदी वृत्तवाहिन्या काहीश्या नकारात्मक वाटाव्यात अस्या बातम्या सातत्याने देत असताना मन प्रसन्न व्हावे अस्या घडामोडी देखील सभोवताली घडत आहेत. मात्र त्यांना अपेक्षीत असी प्रसिद्धी न मिळाल्याने त्या सांगण्यासाठी आजचे लेखन तर मित्रांनो चीनची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मक्तेदारी कमी व्हावी या हेतूने भारत आणि जपानमध्ये.नुकतेच काही करार करण्यात आले .ज्यामुळे भविष्याचे तंत्रज्ञान म्हणून ओळख असणाऱ्या 5जी चे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भारत आणि जपान एकमेकांना साह्य करणार आहेत. 5 जी तंत्रज्ञानामुळे सध्या अशक्य वाटणारी अनेक कामे सहजतेने होतील ज्यामध्ये घरचा टीव्ही , रेफ्रिजेटर , आदी उपकरणे लांबवरून नियंत्रित करणे आदी अनेक कामाचा समावेश करता येईल . याबाबत भारतातर्फे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि जपानच्या परराष्ट्र मंत्री यांनी करारावर स्वाक्षरी केली . क्याड या संघटनेच्या जपानमधे आयोजित केलेल्या अधिवेशनासाठी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर जपानची राजधानी टोकियोत इथे गेले असताना हा करार झाला भारत आणि जपान हे सयुंक्त राष्ट्र संघातील सुर