भारत पुन्हा एकदा जगाची आशा
भारताने स्वतंत्र झाल्यावर काही काळ जगाचे नेतृत्व केल्याचे दिसून येते ज्यामध्ये भारतासारख्याच वसाहतवादाचा शिकार झालेल्या देशाचे महासत्तांच्या राजकारणात अजून नुकसान होऊ नये म्हणून उभारण्यात आलेल्या नामाची स्थापना करण्यात मोलाची भूमिका पार पडणे असो किंवा खेळाच्या माध्यमातून देशांसह एकमेकांशी संपर्क होऊन त्यांच्यातील वैरभावना कमी होऊ शकते या विचारातून आशिया खंडातील देशांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजनाची सुरवात करणे . जगभरात सुरु असलेल्या विविध हिंसक आंदोलनात शांतात प्रस्थापित व्हावी यासाठी संयुक्त राष्टसंघातर्फे पाठवण्यत येणाऱ्या शांतिसेनेत मोठे योगदान देणे या त्यातील काही ठळक बाबी म्हणता येतील कालांतराने हे योगदान कमी होत गेले मात्र मोदी सरकारच्या काळात पुन्हा एकदा जागतिक राजकारणात भारताचे स्थान बळकट करण्याविषयी कार्यक्रम सुरु करण्यात आला परराष्ट्र मंत्रालयाविषयी माध्यमात येणाऱ्या बातम्या बघितल्यास आपणस ही बाब सहजतेने लक्षात येते तुर्की या देशाची राजधानी अंकारा येथे 10 जून 2022 रोजी भारत-तुर्की यान दोन देशाच्या परराष्ट्र खात्यांदरम्यान परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते तु