भारत आणि आग्नेय आशियातील संबंधाची नवी पहाट
भारताच्या ईशान्य भारतातील राज्याकडून नकाश्यात पूर्वेकडे नजर फिरवायला सुरवात केल्यावर आपणास ऑस्टेलियायापर्यंत १० वेगवेगळे देश दिसतात भारतीय संस्कृती आणि चिनी संस्कृतीचा मिलाफ असणाऱ्या या देशाच्या भूभागाला इंडोचायना असे एकत्रित रित्या संबोधले जाते . सध्या जगाचा राजकारणाचा बिंदू ज्या इंडो पॅसिफिक भागात स्थिर झाला आहे त्या भूभागातील बराच मोठा भूभाग या देशांनी व्यापला आहे . त्या देशांनी विविध कारणांनी स्थापन केलेल्या अशियन संघटनेचा भारत हा प्रमुख निरीक्षक देश आहे भारताचे परसदार म्हणून ओळखले जाणाऱ्या या देशांशी भारताचे पूर्वीपासून घनिष्ट संबंध आहेत . तिथे अनेक हिंदू देवतांची मंदिरे आहेत भारत देखील हे संबंध अधिक दृढ व्हावे यासाठी नेहमीच या देशांशी विविध प्रकारे राजनैतिक संबंध ठेवत आला आहे . याच मालिकेचा भाग म्हणून ११ ते १३ नोव्हेंबर या तीन दिवसात भारताचे उपराष्ट्रपती जयदीप धनखरं अशियन -भारत Commemorative परिषद आणि 17 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेसठी कंबोडिया या देशात जाणार आहेत .यावेळी त्यांच्याबरोबर भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर असतील कंबोडिया