भारतात रंगणार ६४ घरांचा आखाडा
येत्या गुरुवार पासून अर्थात २८ जुलैपासून आपल्या भारतात एक युद्ध बघायला मिळणार आहे या युद्धात आधुनिक शस्त्रात्रे वापरली जाणार नाहीत तर पारंपरिक हत्ती उंट घोडा आणि एक वजीर एका राजा तसेच पायी चालणाऱ्या सैनिकाचा यात वापर होणार आहे . महाभारतातील युद्ध १८ दिवस चालले हे युद्ध पुढील १४ दिवस अर्थात १० ऑगस्टपर्यंत चालणार आहे .या युद्धात जगभरातील १८८ देशांनी सहभाग नोंदवला आहे प्रत्येक देशाचे पाच बुद्धिमान सैनिक हे युद्ध खेळणार आहे. त्यांच्या मदतीला ६४ घरांच्या पटांगणात २ उंट २ घोडा २ हत्ती , एक वजीर आणि एका राजा आणि ८ साधे सैनिक असे साथींदार असतील . या युद्धात सहभागी अस्नणाऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करणारे सैनिक यांच्या वापर करत प्रतिस्पर्ध्यावर मात करत या युद्धात यशस्वी होण्याचा प्रयत्न करतील . मी बोलत आहे चेन्नईपासून ५० किमी अंतरावर असलेल्या महाबलीपूरम येथे २८ जुलै ते १० ऑगस्ट या दरम्यान होणाऱ्या ४४ व्य बुद्धिबळ ऑलम्पियाडविषयी . या बुद्धिबळ ऑलम्पियाडमध्ये गेल्या काही बुद्धिबळ ऑलम्पियाडचा विचार करता सर्वात जास्त १८८ संघ खुल्या गटात तर १६२ संघ महिला गटात एकमेकांशी सामना करणार आहे