हवामान बदल आणि आपण
दिनांक 24 सप्टेंबर रोजी टिव्हीवर सर्फिंग करत असताना सिंगापूर येथून प्रक्षेपित होणाऱ्या "चँनेल न्युज एशिया" या वृत्तवाहिनीवर इनसाईट या मालिकेत एक चांगला कार्यक्रम बघण्यात आला . त्याचे नाव "Climate change India's Disaster" असे होते . भारतीय वृत्तवाहिनीवर या प्रकारचे कार्यक्रम का होत नाही? हा प्रश्न सोडुन देवूया .मला तूमचे लक्ष वेधून घेयचे आहे, ते त्यात सांगितलेल्या माहितीकडे . एक तासाच्या या कार्यक्रमात सांगण्यात आलेल्या आकडेवारीनुसार जगात बदलत्या हवामानाच्या ज्या अनिष्ट घटना घडत आहेत , त्यापैकी 10%, घटना भारतात घडत आहेत. या घटनांमुळे "बदलत्या हवामानामुळे प्रभावित होवून गरीब झालेले लोक असा स्वतंत्र्य लोकसमुह भारतात आगामी काळात अस्तिवात येवू शकतो . भारतात सध्या होणाऱ्या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका गरीब जनतेला बसणार आहे . भागाचा विचार करता सर्वाधिक लोकसंख्येचा बिहार, मुंबई अस्या प्रदेशांना तो जास्त बसणार आहे . यासाठी दिवसोंदिवस लहरी होत जाणारे हवामान , तसेच प्रशासनाचे अपुरे, अयोग्य पद्धतीने नियोजन यासाठी जवाबदार असल्याचे यात सा