नमन आधुनिक भारताच्या निर्मात्याला
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आधुनिक भारताची उभारणी करण्याचे शिवधनुष्य ज्यांनी आपल्या खांद्यावर लीलया पेलले , अश्या ऋषितुल्य व्यक्तीमत्त्वांपैकी एक असणाऱ्या पंडीत जवाहरलाल नेहरु यांची 14नोव्हेंबर ही जयंती, त्या निमित्ताने सर्वप्रथम त्यांना विनम्र आदरांजली. 1947च्या सुमारास एखाद दोन वर्षे मागे पुढे जगभरातील 90 हुन अधिक देश पारतंत्रातून स्वतंत्र झाले, त्या देशातील आजची स्थिती आणि भारताची सद्यस्थिती याचा मागोवा घेतल्यास आपणास पंडीत नेहरु यांचे योगदान लक्षात येते. भारताच्या स्वातंत्र्याच्यावेळी अनेक ब्रिटीश आणि पाश्चात्य विचारवंतांनी भारताच्या भवितव्याबाबत अत्यंत प्रतीकुल मते व्यक्त केली होती. ती मते खोटी ठरवली गेली, ती पंडीत नेहरुंमुळेच. एखाद्या वर्गात जर 60 विद्यार्थी असतील, तर वर्गातील सर्वच विद्यार्थी पहिल्या क्रमांकावर उतीर्ण होत नाही, एखाद दुसराच पहिलाच क्रमांकाने उतीर्ण होतो, मात्र यामुळे पंधरा अथवा विसाव्या क्रमांकाने उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला कमी लेखणे चूकीचे असते. तसेच भारताबरोबर स्वतंत्र झालेल्या देशांचे आहे. भारताबरोबर स्वतंत्र झालेल्या देशांपैकी काही देश प्रगतीबाबत भारताच्या