अस्थिरतेच्या कड्यावर पाकिस्तान ?
सध्या आपल्या महाराष्ट्रात राजकीय लाथाळ्यांच्या बातम्या तसेच दिवाळीविषयक बातम्यां देण्यात माध्यमे व्यस्त असताना आपल्या शेजारील पाकिस्तान अस्थिरतेच्या कड्यावर तर नाही ना ? असे वाटावे अश्या बातम्या आंतरराष्ट्रीय माध्यमांतून वाचायला मिळत आहे . पाकिस्तानने त्यांच्या देशातील राजकीय अस्थिरता लक्षात घेवून तैहरीके ए लब्बेक या संघटनेवरील बंदी हटवणे, त्यांना निवडणूका लढवण्याची परवानगी देणे, तसेच पाकिस्तानच्या तूरुंगातुन 2300 तैहरीके ए लब्बेक च्या कार्यकर्त्यांची मुक्तता करण्याची बातमी ताजी असताना पाकिस्तानमधील दूसरी दहशतवादी संघटना तैहरीके तालीबान पाकिस्तान (संक्षीप्त नाव TTP) या संघटनेबरोबर शांततेविषयक चर्चा सुरु केल्याची बातमी wionने दिली आहे. टी टी पी या दहशतवादी संघटनेची स्थापना 2007 साली झाली. स्थापनेनंतर काही वर्षातच आपल्या हल्यातून सर्वाधिक बळी घेणारी दहशतवादी संघटना म्हणून तैहरीके तालिबान पाकिस्तान (टी टी पी) ओळखली जावू लागली. एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जर दहशतवादाचा मार्ग सोडून लोकशाही मार्ग स्विकारत असल्याचे दिसून आल्यास आम्ही त्याचाशी चर्चा करायला तयार आह