ये आनंद तो गुजर चूका
राजेश खन्ना (ज्यांचा अंत फार वेदनादायक झाला )आणी अमिताभ बच्चन यांचा एक अजरामर जिवनाकडे नव्या द्रुष्टीने पहायला शिकवणारा चिञपट म्हणजे आनंद . या चिञपटाच्या अखेरीस अमिताभ बच्चन यांच्या तोंडी एक वाक्य आहे ." आनंद मरा नही ! आनंद मरते नही ! पण अमिताभ बच्चन यांना वाईन कँपिटल आँफ इंडीया मध्ये आनंद या नावाशी साधम्य साधणारे चिञपट ग्रुह आहे . हे कदाचित माहीती नसावे . कारण ये पुलीस स्टेशन हे ! तुम्हारा बाप का घर नही असे ठणकावून सांगणार्या या अभिनेत्याने नाहीतर हे सांगताना विचार केला असता , की आपला आनंद अमर आहे पण जगातील सर्व आनंद अमर नाहीत . काही आनंद नावाशी साधम्य असणार्या चिञपटग्रुहाना सरकारी अनास्थेमुळे अंतकाळ बघावा लागू शकतो . ज्यात नाशिकच्या विजयानद नावाच्या चिञपटग्रुहाचा पण समावेश आता होण्याची शक्यता आहे . याच विजयानंद मध्ये बालगंधर्व यांच्या नाटकाचा प्रयोग सूरू असताना औरंगाबाद उर्फ दाराशुकरोबाद उर्फ संभाजीनगर उर्फ खडकी या शहरातून आलेल्या एका अनंत कान्हेरे नावाच्या विशीतील तरुणाने तत्कालीन नाशिकचा जिल्हाधीकारी जँक्सन जो स्वत: संस्क्रुत चा जाणकार होता त्याचा वध केला . मराठी चिञपटां