मना सज्जना
१८ ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली . आईने मोबईल खेळायला न दिल्याने एका १२ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची ती घटना होती . उद्याचे भविष्य ज्या व्यक्तींच्या हाती आहे तिची मनोवस्था कोणत्या परिस्थितीत आहे याचा हा ठसठशीत पुरावाच म्हणता येईल . हे फक्त एका प्रातिनिधिक उदाहरण आहे जर आपण रोज वर्तमानपत्राचे वाचन केले तर आपणस अश्या अनेक घटना वाचावयास मिळतील . एक गंभीर समस्या असून देखील आपणाकडे याकडे दुर्दैवाने फारशे काही बॊलले जात नाही . अशी एखादी घटना ऐकल्याने आई वडिलांनी अति लाड केल्याने त्या मूलने मुलीने असे पाऊल उचलले असे म्हणून सोडून देण्यासारख्या या घटना नाही अति लाडाने १०० मुलामुलींपैकी एखादा असे टोकाचे पाऊल उचलेल मात्र जेव्हा अश्या घटनांची संख्या प्रचंड वाढते तेव्हा ती समस्या फक्त काही लोकांची वैयक्तिक समस्या राहत नाही तर सामाजिक समस्या होते लहान मुळा मुलींची आत्महत्या हि सुद्धा अशीच सामाजिक समस्या आहे पूर्वी कधीही होत नव्हत्या इतक्या मोठ्या प्रमाणात आता सुजाण पालकत्वाबाबत कार्यशाळा होत आहेत . विविध वृत्तवाहिन्यावरील कार्यक्रम आणि वृत्तपत्रातील लेख बघत