भारतीय रेल्वेच्या प्रगतीला ब्रेक ?
सध्या भारतीय रेल्वे प्रगतीची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहे हे आपण जाणतातच . मात्र या प्रगतीला खीळ तर बसणार नाही नाही ना ? अशी शंका यावी अशी बातमी नुकतीच समोर आली . तर मित्रानो , त्याचे असे झाले की , राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या सर्व सरकारी खर्चाचे लेखापरीक्षण (Audit ) करणाऱ्या CAG या आपल्या संविधानात नमूद केलेल्या संस्थेमार्फत आर्थिक वर्ष 2018-2019 साठी लेखापरीक्षण करताना रेल्वेबाबत अत्यंत प्रतिकूल अहवाल तयार करण्यात आला आहे . हा अहवाल दिनांक 2020 सप्टेंबर 23 रोजी संसदेसमोर मांडण्यात आला आहे . या अहवालात काय आहे ? हे समजण्यासाठी आपणास एक बाब माहिती असणे आवश्यक आहे . ती म्हणजे ऑपरेशन रेशो . एखाद्या संस्थेला 100 रुपये मिळवण्यासाठी किती रुपये खर्च करावे लागतात म्हणजेत्या संस्थेचा ऑपरेशन रेशो जर 85 रुपये खर्च करावे लागले तर त्या संस्थेचा ऑपरेशन रेशो .85 , जर दुसऱ्या संस्थेला 90 रुपये खर्च करावे लागले तर संबंधित संस्थेचा ऑपरेशन रेशो 90 . जर एखाद्या संस्थेचा ऑपरेशन रेशो 100 पेक्षा जास्त असेल तर ती संस्था तोट्यात असते. सर्वसाधारण खासगी संस्थे