अशांत पूर्वांचल
आपल्या महाराष्ट्रात पावसामुळे हाहाकार उडाला असताना भारताच्या एका टोकाला असणाऱ्या दोन राज्यात अर्थात आसाम आणि मिझोराम राज्यात सीमेवरून वाद उफाळला आहे . सन 1972 साली आसाम राज्याचे राज्याचे पुनर्गठन झाल्यापासून तीव्रता या प्रश्नातील दाहकता वाढली होती ,जिने गेल्या काही वर्षापसूम गंभीर स्वरूप धारण केले आहे . मी या आधी याच ब्लॉग मधून समस्येविषयी लिहले होते . ज्यांना ते वाचायचे असेल त्यांनी या लेखाच्या शेवटी असणाऱ्या लिंकवर क्लिक करावे . सध्या या समस्येने अत्यंत हिंसक स्वरूप दाखल केले आहे आसाम राज्यात . 10 जुलैपासून सुरु असलेल्या या ताज्या संघर्षात सर्वप्रथम 10 जुलै रोजी आसाम मिझोराम यांच्या सीमावर्ती भागात मात्र आसाम राज्यात एक छोटासा बॉम्ब ब्लास्ट झाला दुसऱ्याच दिवशी अर्थात11 जुलै रोजी सीमावर्ती भागाच्या मिझोराम राज्यात बॉम्बब्लास्ट झाला याबाबत दोन्ही राज्यांनी विरोधी राज्याला जवाबदार धरले 24 जुलैच्या मध्यरात्री आसाम राज्य पोलिसांनी मिझोरामच्या प्रदेशात घुसून तेथील नागरिकांवर अत्याचार केले असे सांगत मिझोराम राज्यातील नागरिकांनी आसाम राज्य पोलिसांवर हल्ला केला . मिझोरामच्या