सिंहावलोकन २०२२ , भारत आणि जागतिक परिषदा,
हे २०२२ वर्ष भारतासाठी अत्यंत महत्वाचे ठरत आहे . जगातल्या अनेक परिषदांमध्ये भारताने या वर्षी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली या परिषदांमध्ये कॉमनवेल्थ , ब्रिक्स , जी सेव्हन इंडिया इस्राईल यूएसए . युएइ ( आय . टू यु टू ) कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ( कॉप ) शांघाय कॉ ऑपरेशन ऑर्गनायझेशन (, एससीओ ) , जी ट्वेन्टी , युनाटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल ( यु . एन . एस . सी .) आदी विवध मंचावर भारताची यावर्षी दाखल घेण्यात आली जून महिन्याचा अखेरच्या आठवाड्यत आपले परराष्ट्रमंत्री एस जयशंकर रंवाडा या देशात गेले होते तिथे ते काँमनवेल्थ हेड आँफ गव्हरमेट मिटींग ( जी चोगम नावाने प्रसिद्ध आहे ) मध्ये पंतप्रधान मोदींचे प्रतिनिधीत्व केले दोन वर्षाच्या खंडांनंतर चोगम आँफलाईन पद्धतीने प्रथमच झाली आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आपल्या उद्धाटनपर प्राथमिक संबोधनात , काँमनवेल्थ देशांना परस्पर सहकार्याने स्वतःच्या आर्थिक विकास साधण्याची संधी असल्याचे , तसेच परस्पर देशात