पोस्ट्स

चीन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भारत चीन संबंधांचा आत्ताच्या काळापर्यंत सविस्तर आढावा घेणारे पुस्तक 'भिंती आडचा चीन'

इमेज
               आपल्या मराठीत सध्या जागतिक राजकारणाविषयी अनेक नवं नवीन  पुस्तके प्रसिद्ध होत आहेत. या पुस्तकांमुळे आता आतापर्यंत काहीसा अपरिचित असणारा भारताचे परराष्ट्र धोरण हा विषय मराठी जणांना मोठ्या प्रमाणात परिचित होत आहे. या सकारात्मक बदलातील एक घटक असलेले 'भिंती आडचा चीन',हे श्रीराम कुटे लिखित आणि मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित पुस्तक मी नुकतेच सावाना या नाशिकमधील सुप्रसिद्ध सांस्कृतिक संस्थेच्या मदतीने वाचले.                   भारत चीन संबंधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफशियल इंटेलिजियन्स क्षेत्रात चीन करत असलेली प्रगतीमुळे काय फरक पडू शकतो आणि का फरक पडणार ? याविषयी  सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे.तसेच गेल्या दोन वर्षापासुन सुरु असलेल्या रशिया युक्रेन युद्धामुळे भारत आणि चीन राजनैतिक संबंधावर देखील हे पुस्तक भाष्य करते.या खेरीज भारताला चीनच्या विचारसरणीचे, आर्थिक लष्करी आणि राजकीय आव्हान भविष्यात कसे असेल या मुद्द्यांवर देखील या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे‌   ...

,कोरोना पश्च्यातील चीन उलगडणारे पुस्तक, 'चीन, रंग आणि ढंग',

इमेज
           गेल्या दोन तीन वर्षापासून मराठीत विविध विषयांवर   माहितीपुर्ण पुस्तके येत आहेत . पुर्वी या विषयांवर मराठीत अभ्यासपुर्ण पुस्तक येणे शक्यच नाही असे वाटे , त्या विषयांवर देखील माहितीपुर्ण पुस्तके येत आहेत . जे अत्यंत उत्तमतेचे लक्षण म्हणता येईल . सातत्याने वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानासह , भारताच्या   परराष्ट्र धोरणावर परीणाम करणाऱ्या चीन सारख्या देशांवर देखील आता मोठ्या संख्येने पुस्तके निघत आहेत . याच मराठी पुस्तकांमध्ये समावेश होवू शकेल असे एक पुस्तक , मी नूकतेच वाचले .' चीन , रंग आणि ढंग ',  या ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि डॉ . अनंत पा . लाभसेटवार यांनी लिहलेल्या या पुस्तकात कोव्हिड नंतरच्या जगात चीनचे आर्थिक , राजकीय , आणि लष्करी स्थान काय असेल . याबाबत माहिती मिळते .        सुमारे पावणेतीनशे पानाचे हे पुस्तक , चीनचे नेतृत्व , राजकारण , अर्थकारण , करोनाचे हत्याकांड या चार भागात विभागले आहे . प्रत्येक भा...

पाकिस्तान होईल का ब्रिक्स चा सदस्य ?

इमेज
चीन, भारताच्या जागतिक महासत्ता  होण्याच्या वाटेतील मोठा अडथळा  असणारा देश.  स्वतःला जागतिक महासत्ता होण्याचे असल्याने भारताला त्रास देण्याचा सातत्याने प्रयत्न करणारा भारताचा शेजारी देश म्हणजे चीन.सीमेबाबत वाद असला तरी चीनने भारताची महासत्ता होण्याची ताकद ओळखली आहे.त्यामुळे ज्याप्रमाणे एका म्यानात दोन तलवारी राहु शकत नाहीत, त्याप्रमाणे चीन स्वतःच्या  महासत्ता होण्याचा वाटेतील अडथळा अर्थात आपल्या भारताला सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो.त्याच मालिकेत चीनने एक नविन कार्ड नुकतेच खेळले आहे.ते म्हणजे जगात सर्वाधिक वेळा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदत मागणाऱ्या ,काही महिन्यांपूर्वी ज्या देशाचा पंतप्रधान जगात अक्षरशः कटोरा घेवून भगवान के नाम पर, अल्ला के नाम कुछ देदेरे बाबा भगवान अल्ला तूम्हारा भला करेगा असे म्हणत जगात फिरत होता.त्या पाकिस्तानला ज्या गटाचा एकत्रीत जिडीपी जगात जी 20, जी 7 या दोन गटानंतर तिसऱ्या क्रमांकाचा आहे,त्या ब्रिक्स या गटाचे सदस्यत्व देण्याबाबतची आग्रही भुमिका मांडण्याचे .त्यासाठी तो रशियावर अप्रत्यक्ष दबाव देखील आणत आहे.एकेकाळी रशिया चीन राजनैति...

भारत चीन संघर्ष आणि जागतिक राजकारण हे सुलभतेने उलगडणारे पुस्तक " "शी जिनपिंग यांचा विस्तारवादी चीन आणि भारत चढती कमान वाढते तणाव"

इमेज
चीन, ज्या 7देशांबरोबर भारताची जमिनीवर सीमा आहे त्या देशांमध्ये दुसरी मोठी भुसीमा असणारा देश म्हणजे चीन, (पहिली बांगलादेश {भारत बांगलादेश सीमा वेडीवाकडी असल्याने सहज लक्षात येत नाही.मात्र ती सीमा सरळ केल्यास भारताची सर्वाधिक सीमा बांगलादेशाबरोबर आहे}) नकाश्यात ज्या देशाची भारताबरोबरची सीमा बघताना अनावधानाने नेपाळ आणि भुतान बरोबरची त्या देशाची  सीमा देखील भारताची सीमा समजली जाउ शकते असा देश म्हणजे चीन, आपणावर 1962साली युद्ध लावणारा देश म्हणजे चीन, भारताबरोबर ब्रिक्स, एस.इ ओ तसेच  एशियन डेव्हलपमेंट  फंड सारख्या  जागतिक व्यासपीठांवर बरोबरचे स्थान मिळवणारा देश म्हणजे चीन. तर असा चीन भारताचा शत्रू आहे की स्पर्धक आणि भारत आणि चीन या दोन देशांतील राजकारणाचे जागतिक संदर्भ समजून घेयचे असल्यास ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांनी लिहिलेले आणि रोहन प्रकाशनातर्फे प्रकाशित असे "शी जिनपिंग यांचा विस्तारवादी चीन आणि भारत चढती कमान वाढते तणाव" हे पुस्तक वाचायलाच हवे. जे मी नुकतेच सावाना घ्या मदतीने वाचले.       22 प्रकरणातून त्यांनी हा विषय सविस्तरपणे मांडला आहे.सुमारे 214 ...

काळरात्र 34 वर्षांपूर्वीची

इमेज
           आपल्या भारतात सन 2014 एका विचारसरणीच्या पक्षाकडून त्याच्या पुर्णतः विरुद्ध   विचारसरणी असणाऱ्या पक्षाकडे कोणताही रक्तपात न होता सत्तांतर झाले पुढे पाच वर्षांनी 2019 सुद्धा कोणसंघटन करण्याचा ताही रक्तपात ना होता आधीचाच पक्षाची सत्ता काय राहिली . सन 2014 च्या आधी काही लोकशाही हक्कासांसाठी देशभरात आंदोलन झाले   मात्र त्यात सरकारी पक्षाकडून बाळाचा वापर करण्यात आला नाही या आधीही आपल्या भारताच्या इतिहासात कित्येकदा एका पक्षाचे सरकार जाऊन   . पूर्णतः विरूद्ध पक्षाचे सरकार आले आहे . जगात अन्यत्र कुठे झालेला नाही असा निवडणुकीच्या   कम्युनिष्ठ पक्षाने सत्ता घेण्याचा प्रकार देखील भारतात घडला . आपल्या भारतीयांनी राज्य विधानसभेच्या निवडणुकीत एका पक्षाला   मतदान केले तर त्याचवेळी किंवा त्या निवडणुकीपासून काही कालावधीत झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत दुसऱ्या पक्षाला मतदान केल्याचेही दिसून येते . याला कारण म्हणजे भारतात खोलवर   र...