धांडोळा आणीबाणीचा
२५ जून १९७५ भारतीय इतिहासातील एका काळ्या पर्वाची सुरवात होण्याचा दिवस . आज आपण त्यास आणीबाणीचा कालखंड म्हणून ओळखतो . जुन १९७५ ते मार्च १९७८ आणीबाणीचा कालखंड ओळखलं जातो . भारतातील तिसरी आणीबाणी होती ती आधी १९६२ साली आणि १९७१ साली आणीबाणी लादण्यात अली होती . मात्र आणीबाणी म्हंटली की आठवते ती हीच . जिने त्याकाळी मानवी आयुष्यात प्रचंड उलथापालथ केली . अनेक नव्या राजकीय संकल्पना जन्म दिला . जसे द्विपक्षीय लोकशाही . वगैरे . अमेरिका ग्रेट ब्रिटन च्या धर्तीवर द्विपक्षीय लोकशाहीचापाया घालण्याचा एक प्रयत्न त्यावेळी करण्यात आला होता , जो कालांतराने फसला . तो जर यशस्वी झाला असता तर भारतीय लोकशाहीची वाटचाल एका नव्या वळणावर झाली असती यात शंका नाही . आणीबाणीचा समाजजीवनावर झालेला परिणाम म्हणजे त्या काळात संजय गांधी यांनी सुरु केलेली आणि प्रमाणात ज्यास अतिक्रेकी प्रमाण सुध्द्दा म्हणता येईल इतक्या प्रमाणात करण्यात आलेली नसबंदी . लोकसंख्या वाढीला त्यामुळे काही प्रमाणात आळा बसला . काहीच दिवसापूर्वी भारताची लोकसंख्या येत्या काही वर्षात चीनला मागे टाकेल अ